शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

बौद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांचे विचार..........

•माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. जगाचं कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल.




•तरुण लोक धर्माविषयी बेफिकीर बनत चालले आहेत हे पाहुन मला दुःख होते. काही लोक समजतात तशी धर्म ही अफुची गोळी नाही. माझ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा माझ्या शिक्षणाचे फायदे समाजाला द्यावेत असे मला वाटते ते माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म पाहिजे पण धर्माच्या नावावर ढोंगीपणा मला नको आहे.


•बुद्ध हा साधासुधा मानवपुत्र असुन तो शेवटपर्यंत साधा मनुष्य राहिला व त्याने पददलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खुले केले, हे जगमान आहे, त्याने जन्मतः अलौकिक असण्याचा आव आणला नाही की अलौकिक चमत्कार करण्याची शक्ती आपल्या अंगी असल्याचे भासवुन जनतेला केव्हाही फसविले नाही


•दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही, परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार कराव हाच एक उपाय.


•बौद्ध धम्म महासागरासारखा आहे. त्यात कोणत्याही प्रकाराचा भेदभाव नाही. भगवान बुद्धाने करुणेचा प्रचार करुन त्या काळातील पददलित लोकांची मने आकर्षित केली व त्यांना योग्य मार्ग दाखविला.


•बौद्ध धम्म हा वास्तववादी आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धाचा विश्वास नव्हता.


•भगवान बुद्धांनी जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी धर्म स्थापिला. इतर धर्म देव व मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत. माणसामाणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्वांनुसार जोडणारा बौद्ध धर्म हा एकच धर्म आहे.


•बुद्धाने जगाला एक अत्यंत महान अशी गोष्ट सांगितलेली आहे. मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होऊ शकणार नाही असे बुद्धाचे सांगणे आहे. बुद्धाची विचारसरणी ही लोकशाहीची विचारसरणी आहे.


•बौद्ध धर्माचा वृक्ष भारतात अद्यापही जिवंत आहे. फक्त त्याचा पाला सुकलेला आहे. अशी माझी खात्री आहे कि या वृक्षाला खतपाणी घातले तर हा वृक्ष पुन्हा फोफावेल.


•बौद्ध धर्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे. हा धर्म मानवधर्म आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही उपयुक्त धर्म नाही.


•मी बौद्ध धम्माचे चक्र पुन्हा गतिमान करेन, माझ्या गुरुचा उपदेश दाही दिशांत पसरवीन.


•बुद्धाचे तत्त्वज्ञान चातुर्वर्ण्यव्यवस्था, जातीभेद नाकरते म्हणुन मला ते आवडते. बुद्धांनी केवळ जातीव्यवस्थेविरुद्ध हत्यार उपसले नाही, तर तर आपल्या संघात शुद्रातिशुद्रांना सन्मनाने जागा दिली.


•बौद्ध धम्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही मी तुमच्यासाठीच शोधली आहेत यातील जवाहिरांचा मुक्त वापर करा.


•सागरामध्ये मिळाल्यावर ज्याप्रमाणे गंगा नदीचे पाणी ओळखणे अशक्य असते त्याचप्रमाणे बौद्ध धम्मात आपल्या जाती नष्ट होवुन सर्व समान होतात. असे सांगणारे एकच महापुरुष होत आणि ते म्हणजे भगवान बुद्ध.


•भारतालाच नव्हे तर सर्व जगाला सदाचार शिकविणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय.


•बौद्ध धम्माच्या दृष्टीने सध्याची भारतातील स्थिती शुन्यवत आहे. त्यासाठी आपण धम्माचे चांगल्या प्रकारे पालन करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, कारण बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगामध्ये जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांती राहणार नाही.


•जगाचे कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल. त्या धम्माचा आदी, मध्य व अंत सर्व गोड, हितकारक व कल्याणकारी असा आहे.


•बुद्धाने सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वांतत्र्याचा पुरस्कार केला आहे. तसेच केवळ माणसामाणसातील समानता नव्हे, तर स्त्री आणि पुरुष यांच्यातही त्याने समानता प्रस्थापित केली आहे.


•बौद्ध धम्माचा जीवनमार्ग चिरंतन आहे, तो पुर्ण लोकशाहीवादी आहे. बुद्ध हे लोकशाहीचे महान पुरस्कर्ते होते. बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासुन परावृत्त करण्याचे आहेत. मनुष्यमात्राचे दुःख नि निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धत सांगीतली आहे ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.


•बुद्धाचा हा खरा मानवी धर्म आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितले नाही. म्हणुनच बौद्धधम्म हा मानवधम्म आहे, मानवाच्या संपुर्ण विकासासाठी तो प्रयत्नशील आहे. तो आमच्यासारख्या आधुनिक व अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला पटकन पटु शकतो. बुद्धाची शिकवण अगदे साध्या व स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. या धम्मामध्ये मनुष्यास पुर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सदसद्विवेक बुद्धीला पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत.




•बुद्धाचा धर्म कम्युनिझममध्येही आहे. बौद्ध धर्मातील भिक्षुप्रमाणे कम्युनिस्टांना ठराविक जीवनोपयोगी वस्तु ठेवण्याचा अधिकार आहे. संघामध्ये प्रत्येक भिक्षुला सातच वस्तु ठेवण्याचा अधिकार असतो.



•बौद्ध धर्म व हिंदु धर्म यांची तुलना केल्यास आपणास असे दिसुन येते कि बौद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण हा असुन हिंदु धर्माचा पाया कर्मकांडांचे आचरण हाच आहे. स्नानसंध्या, जपजाप्य, सोवळेओवळे व यज्ञयाग यात हिंदु धर्म सामावलेला आहे. तर केवळ नैतिक आचरण म्हणजेच बौद्ध धर्म होय. बौद्ध धर्मात देव नाही ही करी गोष्ट आहे. देवाची जागा बौद्ध धम्मात नैतिक आचरणाने भरुन काढलेली आहे.


•बुद्धाने अहिंसेबरोबरच इतर अनेक गोष्टींचाही हिरीरीने पुरस्कार केला आहे. हि गोष्ट विसरता कमा नये. सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचाही बुद्धाने पुरस्कार केलेला आहे. बौद्धधर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी साजेसा असा धर्म असुन तो इहलोकीच मनुष्यमात्राला मुक्त करण्यास सर्वतोपरी समर्थ असाच धर्म आहे. म्हणुन मेल्याशिवाय स्वर्ग न दिसु देणाऱ्या इतर कोणत्याही धर्मापेक्षा तो केव्हाही श्रेष्ठच ठरणार.


•बौद्धवाद व ब्राह्मणवाद यामधील फरक व भेद नीट लक्षात ठेवण्यास मी तुम्हास सांगत आहे. यापैकी एकाची तुम्हास निवड करायची आहे. बुद्ध हा मानव होता. बुद्धाची तत्वे जातीवर्गाविरुद्ध होती. बुद्धाने सामाम्य जनतेत वास्तव्य केले आणि मानवी दृष्टीकोनातुन जनतेची दुःखे दुर करण्याचा प्रयत्न केला.


•साऱ्या भारत देशाने बौद्ध धर्म स्विकारावा. बौद्ध धर्म व हिंदु धर्म एकच आहे ही गोष्ट खोटी आहे. त्यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे.

•बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदु धर्मातील मते आणि दैवते बौद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध चालणार नाही.


•नवीन झालेल्या बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे कि त्यांनी दर रविवारी बौद्ध विहारात गेले पाहिजे असे जर झाले नाही तर नवी बौद्धांना धर्माचा परिचय होणार नाही. यासाठी ठिकठिकाणी बुद्ध विहारे निर्माण झाली पाहिजेत. विहारात सभा घ्यायला जागा असावी. लंका, बर्मा, थायलंड इत्यादी देशातील भिक्षुंनी पुढाकार घेऊन पैसा गोळा करावा व भारतातील बौद्ध लोकांना मदत करावी.


•बुद्धाच्या शिकवणुकीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व रामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील यात शंका नाही.


•बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या मंडळींना बौद्ध म्हणुनच संबोधले पाहिजे. बौद्ध धम्मात नवबौद्ध असा वेगळा पोटभेद किंवा वेगळी जमात नाही. बौद्ध धम्मेय म्हटला की तो सर्व एकच होय. बौद्धांत नवा बौद्ध आणि जुना बौद्ध असा प्रकारच नाही. बौद्ध तेवढे सारे एका बौद्ध नावानेच ओळखले जातात, अशी वस्तुस्थिती आहे, त्यामुळे विद्वाण, जाणते यांनी भारतीय नव-दीक्षित बौद्धांना नव-बौद्ध म्हणणे सर्वस्वी चुक आहे. या समाजाला बौद्ध असेच म्हटले पाहिजे.


•बौद्ध धर्माशिवाय अस्पृश्यांना दुसरा कोणताही मुक्तीचा मार्ग नाही.


•बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. तो केवळ धर्म नसुन तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे.


•बौद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण हा आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही मानवी मुल्ये या धर्माने स्वीकारली आहेत. कर्मकांड, जातीभेद यांना बुद्धाने नकार दिलेल आहे. त्यांच्या धम्माचा प्रमुख हेतु ऐहिक जीवनात मनुष्याला सुख शांती, आनंद प्राप्त व्हावा हा आहे.


•बुद्धाचा धर्म म्हणजे नीती. बौद्ध धर्मात देवाची कगा नीतीने घेतली आहे. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे. जर धर्म चालु राहावयाचा असेल तर तो बुद्धिप्रामाण्यवादी असला पाहिजे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे.


•मला बौद्ध धर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात तीन तत्वे सापडत नाही, ती मला बौद्ध धर्मातच सापडतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवितो. तो अंधश्रद्धा नि अद्भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्वे शिकवितो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करु शकत नाही. मार्क्सवाद आणि साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरुन टाकले आहेत.



•बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पुर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवुन आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवुन आणतो.


•मला कोणी अंधभक्त नकोत. बौद्धधर्मात ज्यांना यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने यावे. तो धर्म बुद्धीला पटला पाहिजे. ज्यांना माझ्याबरोबर यायचे नाही त्यांना कुठेही जायला मोकळीक आहे.


•बुद्धाची शिकवण कार्यकारणभाव व अनुभव यावर आधारलेली असल्यामुळे त्याचे अनुयायी त्याच्या शिकवणुकीत योग्यवेळे व अटळ परिस्थीतीत अमलात आणता येत नसेक तर तिच्यामध्ये दुरुस्ती किंवा तिचा संपुर्णतया त्याग करण्यास स्वतंत्र आहेत. बुद्धधर्म नैतिकतेवर आधारलेला आहे. सामाजिक गरजांच्या पोषणातुन निर्माण झालेली नैतिकता ही एक बाह्य शक्ती आहे. बुद्धाचा धम्म म्हणजे नैतिकतेशिवाय दुसरे काहीच नाही.


•बौद्ध धर्माचा इतिहास म्हणजे एक तृतीयांश मानवजातीच्या गेल्या अडीच हजार वर्षातल्या सुधारणेचा इतिहास आहे.

•बुद्धाचा मार्ग अधिक व्यावहारिक आहे. दुःख आहेच, मात्र ते जाणण्याची शक्ती माणसाचे ठायी असली म्हणजे झाले. सारांश, बुद्धाचा धर्म हा विशेषतः मानवी आहे, दैवी नाही.


•हिंदु लोकांना आपले राष्ट्र जगवायचं असेल तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे.


•बौद्ध धर्माचा प्रसार करणे हे प्रत्येक बौद्धाचे कर्तव्यच होय. एवढी गोष्ट कोणत्याही देशातील लोकांनी लक्षात ठेवली म्हणजे पुरे आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करणे म्हणजे मानवसेवा करणे होय. हा विश्वास ठेवला म्हणजे कार्य यशस्वी होणार.


•बौद्धधर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरीता, सुखाकरिता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता आहे. हा धर्म नुसत्या माणसांनीच स्वीकारुन चालणार नाही, तर देवांनीसुद्धा त्याचा स्वीकार करावयास पाहिजे.


•बौद्ध धर्मात मात्र भेदभाव नाही, सर्वत्र समसमानता आढळुन येईल.



•आता बौद्ध धर्माची लाट आली, तर ती कधीही परत जाणार नाही. धर्म स्थापनेसाठी देवळाची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु स्वकष्टाने मला एक देऊळ बांधावयाचे आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल. पण त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. तुम्ही पैसे जमवुन देत असाल तर बांधीन व चांगले बांधीन. आपल्या पराक्रमाने बांधीन, दुसऱ्याच्या ओंजळीने बांधणार नाही.


•बौद्ध विहारे प्रत्येक खेड्यापाड्यातुन उभारली पाहिजेत व लाखोंच्या संख्येने बौद्ध वाङ्मयाचा प्रसार झाला पाहिजे.


•आपला महाराष्ट्रसुद्धा शंभर टक्के बौद्धमय होता आणि त्याला पुरावा म्हणुन महाराष्ट्रातील पुरातन काळाच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील, भारतातील दीडहजार लेणी महाराष्ट्रातच आहेत. ही लेणी म्हणजे बौद्ध भिक्षुंची राहण्याची ठिकाणे होती. महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत असे सांगण्यात आले, परंतु विराट नगरी कोठे आणि पांडवांचे राज्य कोठे?


•माझे आयुष्य थोडे राहिले आहे. दुर्दैवाने जी सामाजिक कार्ये माझ्याकडुन कदाचित पुर्ण झाली नसतील, पण मी निश्चय केला आहे. इतर कार्यातुन मी निवृत्त होणार आहे, मला आता बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावयाचे आहे.


•बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या नियमाप्रमाणे वागायला पाहिजे. तलवारीच्या धारेप्रमाणे शुद्ध आचरण करणारे पाचच अनुयायी मिळाले तरी पुष्कळ झाले.


•बौद्ध धर्म मी स्वीकारला आहे, तुम्हीही स्वीकारा. नुसत्या अस्पृश्य समाजाने तो स्वीकारुन चालणार नाही, तर साऱ्या भारताने व त्याचबरोबर साऱ्या जगानेही बुद्धाचा धर्म स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे.


•बुद्धाचे तत्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे. त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासुन दुर व शांततेच्या नजीक जाईल.


•मानवतेचे संपुर्ण संरक्षण करण्यासाठी भारतालाच काय पण सार्या जगाला शेवटी बुद्ध धर्माची कास धरावी लागेल.


•बौद्धकाळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशांतील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापुर्वी कधीही असा गौरव भारतास प्राप्त नव्हता.


•माझा गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीपासुन ते मी काढले आहे, माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेस क़्हार उच्च स्थान आहे.


•मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मानसन्मान वाटेल अशी कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मडके अडकवुन घेत आहोत असे मानु नका. बौद्धधर्माच्या दृष्टीने भारताची भुमी सध्या शुन्यवत आहे. आपण महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीला आणला असे होवु नये, म्हणुन आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करु. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे.



•जर लोक पुन्हा बौद्ध धर्माचा अंगीकार करतील तर आपला पुन्हा वैभवाप्रत गेल्याशिवाय राहणार नाही.


•बुद्धाचे तत्त्वज्ञान चातुर्वर्ण्यव्यवस्था व जातिअहेद नाकारीत आहे, म्हणुन मला ते आवडते.


•बौद्ध धर्म हाच जागतिक ऐक्याचा एकमेव, अद्वितीय असा धर्म आहे.


•बुद्धाने चार वर्णांवर कु-हाड चालविल्यामुळेच ब्राह्मण त्याचा द्वेष करु लागले, हीच खरी वस्तुस्थिती आहे.


•भगवान बुद्धाने आनंदाला हेच सांगितले- मी सांगतो म्हणुन हा धर्म घेवु नका. व्यवहारात हा धर्म चालु शकेल असं वाटलं तरच घ्या. तुमच्या बुद्धीला पटला तर हा धर्म माना. एकजिवाने, एकचित्ताने आपणास गेले पाहिजे. याच मार्गाने आपला उद्धार होईल.


•बुद्धाने नुसती शांतताच सांगितली नाही. बुद्ध हा खरा विचारवंत होता. त्यांच्यासारखा विचारवंत अजुन पर्यंत जगात झालाच नाही.


•खरोखरच कोणाला जज्ती मोडावयाच्या असतील तर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करावा हा एकच उपाय आहे.


•बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानामध्ये समाजसुधारणा आहे हे माहीत झाले तर जगातील मानवाला बौद्ध धम्माविषयी आकर्षण वाटेल.


•भगवान बुद्ध जेवढे प्रज्ञावंत होते, त्यांच्या एका दशांशाने जरी आपण जागृत झालो तरी देखील करुणा, न्याक्ष व सदिच्छेने आपल्या हातुन जनहिताचे कार्य होईल.


•माझा सर्व बौद्ध जनांना असा सल्ला आहे कि त्यांना जगात सन्मानाने जगावयाचे असेल तर भगौआन बुद्धाच्या शिकवणुकीचा त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा.


•धर्मरचाराचे कार्य करावयाचे असेल तर बुद्धाची शिकवण गोरगरीब लोकांच्या कानावर, मनावर सतत बिंबवली पाहिजे.


•आपण भगवान बुद्धाच्या धर्माचा विचार करु. भगवान बुद्धाने जगाला सर्वात श्रेष्ठ असे कोणते तत्त्व सांगितले असेल तर ते हे कि, मनाची स्वच्छता ठेवा. या द्येयाचे मनाची सुधारणा केल्याशिवाय जगाची अगर मानवाची सुद्धारणा होणार नाही.


•बौद्ध धर्म हा निव्वळ धर्मिक विधीचा धर्म नसुन समाजजीवनाचे तत्त्वज्ञा आहे


•बुद्धाच्या शिकवणीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व सामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील. बुद्ध धर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी समर्थ बनवणारा असाच धर्म आहे.


•बुद्धाव्यतिरिक्त सर्व धर्मसंस्थापकांनी आपण मोक्षदाते आहोत अशी भुमिका स्वीकारली; उलट बुद्धाने स्वतःला कोणतेही दैवी वलय न लावता मार्गदाता म्हणुन संबोधिले. बुद्धाचा धर्म हा नीतिधर्म आहे.


•भगवान बुद्धाने त्याचा शिष्य आनंद याला मृत्युपुर्वी केलेला उपदेश लक्षात ठेवावा असे म्हटले. हे आनंदा, तुम्हीच तुमचा प्रकाश व्हा. तुम्हीच तुम्हाला शरण जा. सत्य हाच तुमचा दीप आहे. स्वतःशिवाय दुसऱ्याकडे जाऊ नका.

•भगवान बुद्ध मुक्ती देण्याचे वचन देत नाहीत. ते म्हणतात की मी मार्गदाता, मार्गदर्शक आहे. मोक्षदाता नाही.


•माझ्या धम्माचा 'माणुस' हा केंद्रबिंदु आहे आणि या जगात माणसामाणसाशी त्यांच्या जीवनात नाते असणे ही केंद्रप्रवृत्ती आहे. ही भगवान बुद्धांची पहिली शिकवण होय.


•जातिभेदावर कुर्हाड घालुन अस्पृश्यतेचे पाप मुळातच मारुन टाकणारा जर एखादा धर्मवीर आपल्या देशात अवतरला असेल तर तो एकटा भगवान गौतम बुद्धच होय.


•जाती नाहीत, असमानता नाही, वरिष्ठपणा नाही, कनिष्ठपणा नाही. सर्व समान आहेत. हे भगवान बुद्धाचे तत्व आहे.


•धर्मांतर हे जबरदस्तीने किंवा सक्तीने करता येणे शक्य नाही. याबाबतीत भीड घालणे योग्य नाही व तिचा उपयोगही होणार नाही. धर्मांतर हे आपल्या मनाला पटले तरच करायचे असते.


•बौद्ध धर्माच्या शुद्ध तत्त्वांच्या बरोबरच ब्राह्मणी तत्वे वाहु देता कामा नये.


•माझी बौद्ध धर्माची कल्पना वेगळी आहे, या धर्मात वकील, बॅरिस्टर, प्रधान, मंत्री होतील अशी तरतुद हवी आहे.


•ज्याप्रमाणे ऊस हा मुळातच गोड असतो त्याचप्रमाणे बौद्ध धर्म सुरुवातीपासुनही कल्याणकारक आहे, मधेही कल्याणकारक आहे व शेवटीही कल्याणकारक आहे. या धर्माचा आदि, मध्य व अंत हे सर्वच गोड हितकारक व कल्याणकारी असे आहेत.


•आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बौद्ध धर्माची लाट परतवुन लावली. परंतु आता मात्र बौद्ध धर्माची जी लाट येईल, ती कधीही परत जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल पण ओहोटी कदापि येणार नाही.



•बौद्ध धर्म मला पटला व तो मी उचलला. राजकारणातील खोट्या निवडणुका मला नको आहेत. खोट्या निवडणुकांनी मी महामंत्री सुद्धा होऊ शकेन, पण हे मला नको आहे. राजकारण हा क्रिकेटसारखा खेळ नव्हे. तो एक संप्रदाय आहे. रामानंदी, कबीर पंथी माणसाला तु पंथ सोड असे सांगितल्याने तो आपला पंथ सोडणार नाही. त्याचप्रमाणे माझा बौद्ध धर्म देखील अटळ आहे. हा धर्म मी एकदा स्वीकारला, मग मला आता त्या मार्गानेच गेले पाहिजे.



•बुद्ध तत्त्वज्ञानाने सामाजिक, मानसिक व राजकीय क्रांती करुन शुद्रातिशुद्रांना उच्चपद प्राप्त करुन दिले होते. त्याकाळी अनेक शुद्र राजे झाल्याचे दाखले आहेत.


•बुद्धिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक वृत्तीच्या मनाला बुद्धाच्या धम्माइतका दुसरा कोणताच धर्मविचार आकर्षित करु शकत नाही.


•भगवान बुद्धांची शिकवण आणी सिद्धांत आधुनिक, बुद्धीसंगत व सदैव समकालीन आहेत, काहीच कट्टरपणा नाही. तुमचे जीवन विवेकपुर्ण असावे हिच बुद्धाची शिकवण आहे.


•जगाला भारताची आठवण म्हणजे गौतम बुद्धाची आठवण होय. भारत देश हा याच जगप्रसिद्ध पुरुषाची जन्मभुमी म्हणुन ओळखला जातो.




सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...






Read Also :



१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी


५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......


बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

चार आर्यसत्य

बुद्ध धम्माचा मुळ पाया कोणता? याचे उत्तरभिधम्मपिटकातील दुसरा ग्रंथ विभंग त्याच्या चौथ्या भागात अर्थात सच्च विभंग नावाच्या ग्रंथात मिळते.


सच्च विभंगातील प्रथम सुतंत भाजनियात सुतंताच्या भाषेत चार आर्यसत्याची प्रस्तावना करुन म्हटले आहे.

चत्तरिआरियसच्चानि

१. दुःख अरियसच्चं
२. दुःख समुदयं अरियसच्चं
३. दुःख निरोध अरियसच्चं
४. दुःख निरोधगामिनि पटिपदा अरियसच्चं



१. पहिले आर्यस्त्य - दुःख



दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडीत आहे. जन्म वृद्धत्व, आजार, मृत्यु, क्लेष आणि सर्वप्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय. अनावश्यक वस्तुची प्राप्ती तथा आवश्यक वस्तुची अप्राप्ती म्हणजे दुःख होय. हे प्रश्न इच्छा नसणारे प्रश्न आहेत. लोक हे प्रश्न टाळण्यासाठी त्यांच्यापरीने प्रयत्न करतात व त्यापासुन मुक्तता मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. हे आर्यसत्य समस्यांशी निगडीत आहे. हे आर्यसत्य प्रतीपादन करुन.समस्याविषयक परिस्थीती व तिचे आकलन विषयी मदत करते. ह्या करीता प्रथन आत्मपरिक्षण आवश्यक आहे. आत्मपरिक्षणा शिवा हे सत्य पुर्ण होत नाही. काळजीपुर्वक निरिक्षणावरुन स्पष्ट होते की जीवन हे अस्थिर आहे.



२. दुसरे आर्यसत्य - दुःखाचे मुळ



बुद्धाने दुःखाच्या उगमस्थानाविषयी सांगितलेले आहे की, प्रत्येक दुःखाच्या मुळा शी उत्कट इच्छा (तृष्णा) असते. त्याचा परिणाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय. उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरीता, अस्तित्वाकरीता किंवा आत्मनाशाकरीता असु शकते.


आपली तीव्र इच्छा हिच मुळ दुःखाचे कारण होय. उदा. राहुलला मोटारकार हवी आहे, तो त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, १५, १६ तास अविश्रांत काम करतो. पैसा मिळवितो. श्रम पडल्यामुळे आजारी पडतो, त्याला दुःख होते. यावरुन तीव्र इच्छा ही मुळ दुःखाचे कारण आहे. सामान्य माणसाने आहे त्यात आनंद मानुन जीवन प्रवाह चालु ठेवावा. म्हणजे गरीबांनी गरीबच राहावे असे नाही, तर मध्यम मार्गाचा अवलंब करावा...



३. तिसरे आर्यसत्य - दुःख निररोध



बुद्ध धम्माचा मुळ उद्देश आहे तो दुःख निरोध. लोभ द्वेष व भ्रम यांचा शेवट करणे हा मुळ हेतु आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे, तो आचसणात आणला पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्याशिवाय तृष्णा क्षीण होत नाही.



४. चौथे आर्यसत्य - दुःख निरोधासाठी मार्ग शोधणे



बुद्धधम्म जीवनाचा मार्ग दर्शवितो. धम्म म्हणजे निती होय आणि नितीचा विकास म्हणजे दुःख निरोधन होय. केवळ नितीच आपल्याला निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचवु शकते. आर्य सांगतात कि जगात दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचे निरोध केला पाहिजे आणि दुःखाच्या निरोधासाठी मार्ग आहे, त्यालाच धम्म शिकवणुकीप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. त्यात आठ घटकांचा समावेआहे. त्यालाच मध्यममार्ग सुद्धा म्हणतात. ते पुढीलप्रमाणे :


१. सम्यक दृष्टी
२. सम्यक संकल्प
३. सम्यक वाचा
४. सम्यक कर्मांत
५. सम्यक आजीविका
६. सम्यक व्यायाम
७. सम्यक स्मृती
८. सम्यक समाधी



थोडक्यात कोणत्याही प्रश्नांची उकल करण्यासाठी शीलाचे पालन करणे आवश्यक आहे. (आत्मसंयम तथा नीती), समाधी (मनसंयम) व प्रज्ञा आवश्यक आहेत. म्हणुन प्रज्ञा, शील, करुणा ह्या तीन बाबीला धम्मात महत्त्वाचे स्थान आहे. ह्या तीन बाबींवर आर्य अष्टांगिक मार्ग आधारित आहे.



काम तृष्णा, भव तृष्णा व विभव तृष्णा ह्या दुःखाच्या मुळाशी असतात. त्यांच्याविषयी प्रत्येकाला जाणीव असावी. तृष्णेवर प्रभुत्व प्राप्त करणे म्हणजे तो जीवनातील सर्वात मोठा विजय होय

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी


५.

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

मनुष्याच्या नितीवान जीवन जगण्यात शीलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बुद्ध भगवंतांनी मनुष्याला श्रेष्ठ व सदाचारी बनविण्यासाठी, त्याला नितीवान जीवन जगण्यासाठी शिलमार्गाचा शोध लावला......


भगवान बुद्धांच्या संघाची विभागणी चार प्रकारात होते...


१. गृहस्थ - गृहीणी
२. उपासक - उपासिका
३. श्रामणेर - श्रामणेरी
४. भिक्खु - भिक्खुणी

ह्या चारही प्रकारात शिलांची विभागणी वेगवेगळी केली आहे. गृहस्थ आणि गृहीणींकरीता पाच शील आहेत, उपासक आणि उपासिकेसाठी आठ शील तर श्रामणेर आणि श्रामणेरींकरींना दहा शिलांचे पालन करावे लागते.


श्रामणेर म्हणजे : शिकणारा भिक्खु,, ज्याचे वय वीस वर्षांपेक्षा कमी आहे. श्रामणेर हा एक परिव्राजक असतो.... बौद्ध उपासक सुद्धा काही काळापर्यंत श्रामणेर ची दीक्षा घेऊ शकतो...


पंचशील

१. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि
२. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि
३. कामेसु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि
४. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि
५. सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि



अष्टशील

३. अब्रह्मचरिय वेरमणि सिक्खापदं समादिया मि

६. विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादिया मि
७. नच्च-गीत-वादित-विसुक-दस्सन वेरमणि सिक्खापदं समादियामि
८. माला-गंध-विलेपान-धारण-मंडन-विभुसनठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि


९. उच्चासयना महासयना वेरमणि सिक्खापदं समादियामि
१०. जातरुप-रजत-पटिग्गहन वेरमणि सिक्खापदं समादियामि




१. मी प्राणी हत्येपासुन अलिप्त राहीन
२. मी चोरी करणार नाही
३. मी मिथ्याचारापासुन अलिप्त राहीन
४. मी खोटे बोलणार नाही.
५. मी मद्यपान आणि इतर नशाजन्य पदार्थांपासुन अलिप्त राहीन


अष्टशील

३. मी ब्रह्मचर्येचे पालन करेन

६. मी विकाल वेळी (दुपारी 12 नंतर) जेवन ग्रहण करणार नाही.
७. मी नृत्य, गीत, संगीत आणि इतर करमणुकीच्या साधनापासुन दुर राहण्याचे शील ग्रहण करतो.
८. मी माळ, सुगंधीत द्रव्ये आणि इतर अलंकारांपासुन दुर राहण्याचे शील ग्रहण करतो.


९. मी जमीनीपासुन उच्चस्थानावर झोपणार नाही.
१०. मी सोन्याचांदीचे दागीने घालणार नाही.



ही आहेत दहा शिल... याती प्रथम पाच शील गृहस्थाने पाळावयाची असतात, तर आठ शील उपासकाने आणि दहा शील श्रामणेराने पाळावयाची असतात.

अष्टशील म्हणताना तिसऱ्या शीलाच्या म्हणजेच कामेसु मिच्छाचारा च्या ऐवजी अब्रह्मचरिय वेरमणि हे शील ग्रहण करावे.

दर अष्टमी, पोर्णीमा आणि अमावस्येला गृहस्थाने अष्टशीलांचे पालन करावे.
शीलाचे पालन जेवढे अधिक तेवढा अधिक आनंद मिळतो.


शीलग्रहण करणे चांगले का मानले जाते?

1. त्यामुळे व्यक्ती सुखी जीवनाकडे वाटचाल करतो.

2. तो दुसऱ्याचा द्वेष करीत नाही.

3. शील ग्रहण करणारी व्यक्ती पुर्णत्वप्राप्त केलेली असते.

4. तो सार्वांचा चांगला मित्र असतो.

शील ग्रहण न केल्यामुळे कोणते परिणाम होतील

१. व्यक्ती क्रुर बनतो.

२. व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा होऊ शकतो

३. कोणी त्याच्यावर प्रेम करणार नाही, त्याच्याशी एकनीष्ठ राहणार नाही.

४. तो दुसऱ्याना व स्वतःशी क्लेषदायी असेल.

५. विद्वान व्यक्ती त्याच्याशी मैत्री करणार नाहीत.


शीलाची उपासना कशी करावी?

सुरुवातीला काही महत्त्वाच्या पायर्या शील ग्रहण करण्यासाठी उपयोगी आहेत.

१. एकावेळी सर्व शीलाची उपासना जर शक्य नसेल तर क्रमाक्रमाने पाच शीलाची उपासना वाढवावी.


२. जर दररोज पंचशील ग्रहण करणे शक्य नसेल तर आठवड्यातुन एक दिवस निवडावा व त्यादिवशी नियमीत शील ग्रहण करावे.


सामान्यतः जगातील बौद्ध पाचही शीलाचे पालन करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सुखी व समाधानी असतात. प्रत्येक कुटुंब जर सुखी व समाधानी असेल तर तो समाज सुखी व समाधानी होईल. समाज सुखी झाला तर सर्व जग सुखी होईल..


त्यामुळे नितीवान जीवन जगण्यासाठी, जीवनात सुखी होण्यासाठी शीलांचे पालन करण्याचा प्रयत्न करा..


पुढच्या दोन भागात आपण भिक्खु - भिक्खुणीच्या विनयांबद्दल माहीती घेऊया...


मंगल मैत्री
सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...







See Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

भगवान बुद्धांना स्त्रीद्वेष्टा म्हणणाऱ्या लोकांचे कोडे...

भगवान बुद्ध स्त्री द्वेष्टे होते, त्यांच्यामुळे भारतीय स्त्रीची अशी दुर्दशा झाली, त्यांनी आपल्या संघात स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले असे विविध आरोप त्यांच्यावर केले जातात.


भगवान बुद्धांच्या शिकवणीसंबंधी जे खोडसाळ आरोप करण्यात येतात ते खोडुन काढणे हे प्रत्येक बौद्ध धर्मियांचे कर्तव्य आहे.


एखाद्या वेळी असल्या आरोपांचे खंडन करण्याची गोष्ट असती तर काही हरकत नाही,, पण आपल्या ठायी असलेल्या अज्ञानाच्या वा अर्धवट ज्ञानाच्या बळावर कितीतरी धर्ममार्तंड आणी त्यांची थुंकी झेलणारे असल्या प्रकारचे आरोप करतात. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीवर हल्ले करणे व आरोप लावणे हे त्यांच्या विरोधकांचे व टीकाकारांचे आवडते काम, अगदी बुद्धकाळापासुन त्यांचा वारसा चालवणारी त्यांची पिल्लावळ आजही आपल्या समाजात वावरत आहेत, पण लवकरच त्यांचेही ह्रदय परिवर्तन होवुन ते सुद्धा भगवान बुद्धांनी सांगीतलेल्या सन्मार्गावर चालायला लागतील अशी खात्री आहे.
यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेख लिहिला होता त्यातील काही भाग :
भगवान बुद्धांच्या धम्मावर जे काही आरोप होतात ते टीकाकाराच्या ठायी असलेल्या अज्ञानामुळेच!

भगवान बुद्ध हे स्त्री द्वेष्टे होते हे सिद्ध करण्यासाठी प्रामुख्याने एक पुरावा (खोटा?) दिला जातो.

भगवान बुद्धांनी प्रथम स्त्रीयांना संघात प्रवेश नाकारला, पण त्यांचे शिष्य आनंदाच्या सांगण्यावरुन त्यांनी स्त्रीयांना संघात प्रवेश दिला खरा, पण आठ अटींवर, आणी त्या आठ अटींमुळे त्यांच्या संघात स्त्रीयांना दुय्यम स्थान प्राप्त झाले.

अशा सर्व धर्ममार्तंड टीकाकारांना हा लेख एक सडेतोड उत्तर आहे...

स्त्रियांनी संघात येऊ नये, असे बुद्धांचे प्रथम मत होते. ते मत बदलुन त्यांनी स्त्रियांना संघात येऊ दिले, पण त्यांनी स्त्रियांचा वेगळा संघ निर्माण केला, तो भिक्खुणी संघ, भिक्खु संघाच्या आज्ञेत राहिला पाहिजे. यासंबंधीचे नियम भगवान बुद्धांनी तयार केले. या सर्व घटनांकडे बोट दाखवुन टीकाकार म्हणतात की, भगवान बुद्धांचे स्त्रियांसंबंधीचे मत चांगले नव्हते. या घटनांचा थोडा जास्त विचार करण्याची आवश्यकता आहे.


१. महाप्रजापती परिव्रजा घेण्यास बुद्धांकडे आली तेव्हा, त्यांनी विरोध का केला? स्त्रियां जात्याच चंचल वृत्तीच्या असतात. त्या आपल्या संघात आल्या तर आपल्या संघाचे समाजातील स्थान कमी दर्जाचे होईल. आपला संघ समाजाला आदरणीय वाटणार नाही, असे बुद्धांना वाटले काय? किंवा






२. स्त्रियां ह्या बौद्धिक आणि नैतिक दृष्टीने आपल्या धर्मातील आणि संघातील पवित्र तत्वे जाणुन घेण्यास व त्याप्रमाणे वर्तन करण्यास असमर्थ आहेत असे बुद्धांना का वाटले. म्हणुन त्यांनी महाप्रजापतीच्या तसेच 500 शाक्य स्त्रियांच्या परिव्रजेला विरोध केला काय?

वरील दोन प्रश्नांपैकी दुसरा प्रश्न एकदा आनंदाने भगवान बुद्धांना विचारला होता. भगवान बुद्धांच्या संघातील स्त्री प्रवेशाला विरोध पाहुन त्यावेळी आनंदाच्या सर्व शंकाचे निरसन भगवान बुद्धांनी केलेले होते. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले होते की, स्त्रिया आपला धम्म आणि धम्मशिक्षा जाणुन घेण्यास व त्याप्रमाणे वागण्यास सर्वस्वी समर्थ आहेत. पण या कारणामुळे बुद्धाचा स्त्रियांना विरोध नव्हता.

स्त्री बुद्धिमता आणि नीतीमता या बाबतीत पुरुषांपेक्षा कमी दर्जाची आहे, असे बुद्ध समजत नव्हता. स्त्रिया चंचल वृत्तीच्या आहेत, असे बुद्ध समजत होता; आणि संघात स्त्रियांना प्रवेश करु दिला तर संघाची समाजातील पत नाहीशी होईल , अशी बुद्धाला भिती वाटत होती. अशाप्रकारचे मत ज्या टीकाकारांचे आहे ते कवडीमोल किंमतीचे आहेत; कारण बुद्धाचे स्त्रियांबद्दल जर तसे मत असते तर त्याने स्त्रियांना संघात कधीही घेतले नसते. भिक्खुणी संघ भिक्खु संघाच्या खालच्या दर्जाचा ठरविण्यात बुद्धाची स्त्रीविषयक दृष्टी कलुषित होती असे जे टीकाकार म्हणतात, त्यांना हे उत्तर :

स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक शारीरिक श्रेष्ठपणा आणि कनिष्ठपणा या गोष्टी लक्षात घेऊनच बुद्धाने, ही दोन संघाची योजना केली नव्हती. ती योजना करण्यात त्याचा केवळ व्यवहारी दृष्टीकोन होता. स्त्रियांना संघात घेण्याचा जेव्हा प्रश्न निघाला तेव्हा, बुद्धांच्या पुढे दोन प्रश्न उत्पन्न झाले.

स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी संघ एक असावा कि दोन वेगवेगळे संघ असावेत? खुप विचार केल्यानंतर त्यांनी ठरवले की, दोन वेगवेगळे संघ असावेत. परिव्रजा घेतल्यानंतर ब्रह्मचर्यावस्थेत राहणे याबद्दल भिक्खु आणि भिक्खुणी शपथबद्ध झालेले होते. परंतु ते हेकत्र राहिले तर, ही शपथब्द्धता अभंग ठेवणे शक्य नव्हते, म्हणुन भगवान बुद्धांनी ठरवले कि भिक्खु आणि भिक्खुणी यांचे संघ वेगवेगळे ठेवणे योग्य आहे. हे सर्व त्यांनी व्यवहारी दृष्टी ठेऊनच ठरविले. स्त्रियांना कमी लेखण्याची त्यांची मुळीच दृष्टी नव्हती. भिक्खुणींसाठी स्वतंत्र संघ निर्माण करण्याच्या वेळी बुद्धाला प्रश्न पडला कि, हे दोन्ही संघ समसमान पातळीवर ठेऊन त्यांत स्त्री-पुरुषांना निःशंक आणि निर्मळ मनाने मिसळता यीएल, अशी योजना करायची की, दोन्ही संघ एकमेकांपासुन अगदी वेगळे ठेवावेत.

भिक्खुणी संघ भिक्खु संघापासुन वेगळा ठेवणे आहे. हा निर्णय बुद्धाने घेतला होताच. भिक्खु आणि भिक्खुणी याण्ना कडक ब्रह्मचर्येचे व्रत पाळावयाचे होते, म्हणुन हा निर्णय ते व्रत पाळण्यास सहाय्यक ठरत होता. स्त्री आणि पुरुष यांच्या आयुष्यात वैषयिक भावनेला फार महत्व आहे याची भगवंताला जाणीव होती. 'वासना स्त्रीला पुरुषाची दासी बनवते तर पुरुषाला स्त्रीचा गुलाम' अशा प्रकारचे उद्गार बुद्धांनी एकदा काढले होते. ही वासना अनियंत्रित स्वरुपात राहिली तर, ती ब्रह्मचर्येला बळी न पडतील अशी व्यवहारी योजना त्यांनी केली, ती स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे संघ निर्माण करुनच.

स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी भगवंतांनी वेगवेगळे संघ काढल. याशिवाय त्यांना दुसरा निर्णय घेत आला असता काय?



ते आठ नियम...


ज्या स्त्रिया संघात आल्या त्या व्यवहारात न पडलेल्या अशा किशोरावस्थेतील होत्या. धम्माची तत्वे आणि आचरणाचे नियम याबद्दल त्यांना उपदेश देऊन तयार करावयाचे होते. हे काम कोणी करावे? संघातील भिक्खुंशिवाय हे काम करण्यास दुसरे कोण योग्य होते? भिक्खु धम्म आणि आचराणाचे नियम पाळण्यात तरबेज झाले होते. म्हणुन बुद्धांनी कोणती सावधानता स्वीकारली? भिक्खु भिक्खुणींना शिकविताना गुरु शिष्यांचे पवित्र संबंध राखले पाहिजे, असा बुद्धांनी नियम केला होता, भिक्खु हे शिक्षक व भिक्खुणी ह्या शिष्या असत. शिक्षक म्हणुन भिक्खुचा दर्जा भिक्खुणींपेक्षा जास्त म्हत्वाचा होता. शिष्या म्हणुन भिक्खुणींचा दर्जा भिक्खुंपेक्षा कमी होतात, आज्ञाधारकपणाचा होता, भिक्खुसंघ हा भिक्खुणी संघावर शिक्षकाप्रमाणे अधिकार गाजवत होता, शासकाप्रमाणे त्यांच्यावर सत्ता गाजवत नव्हता. त्यांना गुलामांची वागणुक देत नव्हता. येथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे आठ नियम भिक्खुणींच्या ३३१ नियमांपेक्षा वेगळे का ठेवले गेले? या नियमांचा अंतर्भाव त्यांच्या ३३१ विनयांमध्ये का होत नाही. हे ज्या आठ नियमांच्या भरवशावर तुम्ही भगवान बुद्धांना स्त्री द्वेष्टे ठरवत आहात, तुमच्यापैकी कितीजन जाणतात कि, हे नियम श्रामणेरांसाठीसुद्धा लागु होतात. एवढेच नव्हे तर प्रत्येक नवा भिक्खु जो दीक्षा घेतो त्याच्यासाठी सुद्धा हे नियम असतात... प्रत्येक भिक्खुने त्याच्यापेक्षा महान भिक्खुला अथवा भिक्खुणीला वंदन केले पाहिजेत असा नियम आहे. स्थाविर, महास्थाविर, इत्यादींद्वारे बौद्ध भिक्खुंचा स्तर कळत असतो,,, स्थाविराने महास्थाविराशी संपर्क करताना हे नियम पाळावे लागतात... स्त्री महास्थाविर बनु शकत नाही अशातला भाग नाही. मग स्थाविर अथा त्याच्यापेक्षा लहान भिक्खुने महास्थाविर थेरीला वंदन केलेच पाहिजेत...... हे तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे?

भिक्खुणी संघ भिक्खु संघाच्या आज्ञेत राहिला पाहिजे, हा नियम चुकीचा ठरतो कायआजच्या आधुनिक युगातही एखादी विद्यार्थीनी आपल्या शिक्षकाचा आदर सत्कार करत असेल तर ती हीन ठरते काय?

भिक्खु आणि भिक्खुणी यांच्यामधील संबंध नियमबद्ध करण्यासाठी बुद्धाने जी योजना आखली ती, स्त्रियांना कमी दर्जा देणारी होती, असा निराळा अर्थ कोणी का लावावा? असा अर्थ लावणे हे तर्कशुद्ध नाही काय? केवळ मुर्खच असा अर्थ काढु शकतात.

भिक्खुंच्या अधिपत्याखाली भिक्खुणींना बुद्धाने ठेवले हा त्याने एक मोठा सामाजिक गुन्हा केला असे जे मानतात, त्यांना बुद्धांनी स्त्रीवर्गाला संन्यासदीक्षा घेण्याची मुभा दिली याबबत जाणीव झाली नसावी. त्या काळात ब्राह्मणी धर्म स्त्रीवर्गाला ज्ञानार्जन करण्यास मुभा देत नव्हता. स्त्रियांनी संन्यास घ्यावा हा एक प्रश्न त्या काळी उपस्थित झाला तेव्हा, ब्राह्मणी धर्माने स्त्रीवर्गावर एक दुसरा अन्याय केला. ब्राह्मण हे वेदांची पुजा करत असत. वेदांना संन्यास मान्य नाही, हे जाणकारांना माहीत असेल, पण त्याकाळेद उपनिषद नावाची धार्मिक ग्रंथ अस्तित्वात होती. पण उपनिषद हि पवित्र धार्मिक ग्रंथ होते असे वैदिकांनी पुष्कळ काळापर्यंत मान्य केले नव्हते. हि ऐतिहासिक घटना आहे. तर्क नव्हे. उपनिषदे संन्यासाला आदर्श समजत होती. आत्मा हा ब्रह्म होय. ही उपनिषदातील प्रमुख शिकवण होय. ती शिकवण आत्मसात करणे हे संन्यासवृत्तीचे ध्येय होते, पण ब्राह्मण लोक संन्यासी जीवनाचे कट्टर विरोधक होते. संन्यासी वृत्तीबद्दल जे कडाक्याचे वादविवाद झाले, त्यांत शेवटी ब्राह्मणांनी संन्यास वृत्तीला मान्यता दिली, ती मान्यता काही अटींवर दिली होती. त्यापैकी एक अट अशी होती की, स्त्रिया व शुद्र यांना संन्यास घेण्याचा अधिकार नसावा.

स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार नसावा अशी अट वैदिकांनी घातली. याचे कारण काय, हे समजावुन घेतले म्हणजे बुद्ध आणि ब्राह्मण यांची स्त्रियांसंबंधी जी मते होती, त्यांच्यातील दक्षिणोत्तर फरक लक्षात येईल. हे कारण मनुने सांगीतले ते असे-

स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही, म्हणुन त्यांचे संस्कार वैदिक मंत्रांशिवाय करावयाचे असतात. स्त्रियांना धर्माचे ज्ञान नव्हते. कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नव्हता. वैदिक मंत्र उच्चारले तर पाप नष्ट होते. ज्याअर्थी स्त्रिया वैदिक मंत्र उच्चार शकत नव्हत्या म्हणुन त्या असतय, पापी स्थितीत राहणाऱ्याच होत...

भारताचा इतिहास आपल्याला हे सांगतो की, प्राचीन काळात ब्राह्मणी धर्माने बंधनांची जी गुलामगिरीची जालीम साखळी निर्माण केलेली होती ती बौद्ध धर्माने खिळखिळी केली आणि शेवटी ताडकन तोडली. हे कसे घडले? वैयक्तिक स्वांतंत्र्य, सामाजिक विषमतेच्या कर्दनकाळातुन पददलित मानवाची प्रबळ इच्छा, आध्यात्मिक ज्ञानार्जनासाठी वनात जाऊन राहण्याची इच्छा उत्पन्न होताच कोणालाही वनात जाण्याचे स्वांतत्र्य असणे याबाबत जे नैसर्गिक मानवी हक्क होते, त्यांना बौद्ध धर्माने पाठिंबा दिला. ते आपले हक्क समाजात प्रस्थापित करु शकले. बौद्ध धर्माचे हे महान ऐतिहासिक कार्य आपल्याला नाकारता येणार नाही.

भगवान बुद्धांनी भारतातील स्त्रियांना हे जे स्वांतत्र्य दिले त्याचे महत्व न मोजता येण्यासारखे आहे. भिक्खुणी संघाला भिक्खु संघाच्या सामित्वाखाली ठेवहे ज्यांना चुकीचे वाटते, त्यांनी भगवान बुद्धांनी स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य लक्षात घेतले, तर ते आपला आरोप चुकीचा आहे हे मान्य करतील. भगवान बुद्धांनी स्त्रियांना जे स्वातंत्र्य दिले ते तकलुपी नव्हते. स्त्रियांनी त्या स्वातंत्र्याचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यांनी त्यांचे पोवाडे गाईले.

ब्राह्मण कन्या मेत्तिका भिक्खुणी झाल्यानंतर तिने एकदा असे उद्गार काढले. 'मी या शिळेवर दररोज ध्यानस्त बसते,तेव्हा स्वातंत्र्याचे श्वासोच्छवास माझ्या आध्यात्मिक साधनेवरुन एकसारखे वाहत असता.

दुसरी ब्राह्मण कन्या मुक्ता, भिक्खुणी झाल्यावर तिने, एकदा असे उद्गार काढले, अहाहा! मी खरोखरच स्वंतत्र आहे. माझ्या स्वातंत्र्याला सीमा नाही.

स्त्रियांना भिक्खुणी होण्याचा हक्क देवुन भगवंतांनी त्यांना स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करुन दिला. एवढेच नव्हे तर लिंगभेदाबद्दल यत्किंचितही अढी न बाळगता त्यांनी स्त्रियांना थोर पदाला पोहोचण्याचा मार्ग मोकळा करुन दिला. एवढेच नव्हे तर, पुरुषांच्या दर्जाबरोबर स्त्रियांचा दर्जा समान होण्याचा मार्ग मोकळा झाला.

तांत्रिक दृष्टीने भिक्खुणी भिक्खुंच्या हाताखाली राहत होत्या हे खरे आणि तितकेच स्पष्ट आहे. भिक्खु संघात जो पुरुष ज्ञान आणि श्रेष्ठत्व यामुळे उच्च पदावर विराजमान झालेला होता, त्याच्या बरोबरेचा भिक्खुणी संघातील थेरो हक्काने मिळवु शकत होती.

कश्यप (महाकश्यप) हा आध्यात्मिक बाबतीत श्रेष्ठ होता. तो संघात प्रमुख होता. त्याचा दर्जा संघसंस्थापक भगवान बुद्ध यांच्या खालोखाल होता. अध्यात्मिक बाबतीत ह्या अशा महान कश्यपाबरोबरीभा समान दर्जा भद्दा या थेरीने मिळविलेला होता. (वाचा : धम्मसुत्त ३७)... याबाबतीत हे स्पष्ट केले पाहिजे, असा दंडक घातलेला नव्हता, विवाहित, अविवाहित, विध्वा आणि वेश्या अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांना परिव्रजा घेण्यास भगवंतांनी संघाचा दरवाजा खुला ठेवला होता. यामुळे सर्व प्रकारच्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य, समता, आत्मविकास, इत्यादी ही मानवी जीवणाची सर्व अंगे प्राप्त करुन घेता येत होती.

हे सुध्दा वाचा :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

धम्मदीक्षेचे महत्त्व : जन्माने कोणीही बौद्ध होत नसतो

मनुष्य जेव्हा भगवान बुद्धाच्या शिकवणीनुसार म्हणजेच धम्मानुसार जीवन जगण्याचा जेव्हा निश्चय करतो आणि शरणगमन करुन पंचशीलांचा स्वीकार करतो तेव्हाच तो बौद्ध बनतो.



परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 24-05-1955 रोजी मुंबई येथे दिलेल्या भाषणात म्हटले होते कि, बुद्धधम्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे. याचा संघदीक्षेवर विपरीत परिणाम होतो. उपासकाच्या मनाची परिपुर्ण तयारी झालेली नसते, परंतु माझ्या धम्मात उपासकांनाही धम्मदीक्षा दिली जाईल. तत्पुर्वी धम्मदीक्षेवर मी एक पुस्तक लिहिणार आहे, ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागणार आहे व त्या पुस्तकातील विचारलेली प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाला द्यावी लागणार. तरच त्याला बुद्धधम्मात प्रवेश मिळेल. बुद्धधम्मात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाने शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजे.




यावरुन धम्मदीक्षेचे किती महत्व आहे हे लक्षात घ्यावे. एक सामाजिक संकेत म्हणुन बौद्ध दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतल्याने म्हणजेच बौद्ध कुटुंबात जन्मलेल्या मुलामुलींना बौद्ध समजले जात असले तरी, कोणीही जन्माने बौद्ध होत नसतो. म्हणुन धम्मदृष्टीने पाहता केवळ बौद्ध कुटुंबात जन्म झाला आहे म्हणुन त्या मुलामुलींना बौद्ध समजले जाऊ नये. अर्थात त्यांच्यावर धम्माचे शुद्ध संस्कार अवश्य घडवावेत आणि सज्ञान झाल्यावर योग्यायोग्यतेचा विचार करुन ते धम्मदीक्षा घेण्यास तयार होतील अशी तयारी अवश्य करुन घ्यावी व त्यांचा धम्मदीक्षा समारंभ सार्वजनीक ठिकाणी अथवा विहाक़ात आयोजीत करणे आवश्यक आहे. या गोष्टीचे पालन आपण कटाक्षाने करायला हवे. या दीक्षेला धम्म संस्कार दीक्षा म्हणावे.




दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अनेक कारणंनी भारतातुन बौद्ध धम्माचे उच्चाटन झाले, त्यातील एक कारण होते धम्मदीक्षेचा अभाव. या कारणामुळे पुन्हा बौद्ध धम्माची कधी काही हानी होऊ नये म्हणुन डॉ. आंबेडकरांनी लोप पावलेले धम्मदीक्षेचे म्हत्त्व पुन्हा प्रस्थापित केले...



The Buddha and his Dhamma या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे. परंतु बौद्ध समाजाचे त्याकडे संपुर्ण दुर्लम्व झाले आहे, हि अत्यंत खेदाचीच नव्हे तर चिंतेची बाब सुद्धा आहे. जन्माने बौद्ध मानण्याच्या दुष्ट रुढीचे अधिकांश लोक शिकार बनले आहेत, यात काही शंका नाही. तर काही लोक नुसती धम्मदीक्षा घेतल्याने कोणी खरा बौद्ध होतो काय? अशा आत्मप्रौढीच्या अहंगंडाने ग्रासलेले दिसतात. खरे किंवा खोटे बौद्ध होणे हे ज्याचे त्याच्याच हातात आहे. जबरदस्तीने काही करता येत नाही. परंतु किमान लौकिक अर्थाने जाणीवपुर्वक कोणी धम्मदीक्षा घेतली तर अशी व्यक्ती निदान अन्य धर्मांच्या प्रभावापासुन दुर तरी राहील आणि आज नाहीतर उद्या तरी परिणामकारक बौद्ध जीवन जगण्यास प्रवृत्त होईल. म्हणुन लोकांना धम्मप्रभावापासुन दुर का ठेवावे?




कुटुंबा - कुटुंबातील इच्छुक तरुण - तरुणीस जर औपचारिकरित्या धम्मदीक्षा देऊन बौद्ध समाजाचे अधिकृत अंग बनविले नाही, तर मात्र काही काळातच बौद्ध धम्माला ओहोटी लागुन युवा पिढी इतर प्रचाराला आणि प्रभावाला बळी पडल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आणि गेल्या तीस वर्षांपासुन घडु लागले आहे आणि त्याचे दुष्टपरिणामसुद्धा दिसु लागले आहेत.


या गोष्टीची सर्व बौद्धसमजाजान गंभीरपणे दखल घ्यावी अशी आमची नम्र सुचना आहे.



प्रतिज्ञा आपण करु या - जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची


प्रतिज्ञा आपण करु या - आहेत आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची


प्रतिज्ञा आपण करु या - आहेत सत्य अनंत, ती पुर्ण आकलण्याची


प्रतिज्ञा आपण करु या - भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपुर्ण साध्य करण्याची




सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


मंगल मैत्री



Read Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)


२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज



३. Buddha Vandana : English



४. बुद्ध वंदना : मराठी

बुद्ध वंदना : मराठी

अरहंत सम्यक सम्बुद्ध भगवान अशा बुद्ध भगवंतास मी अभिवादन करतो.

त्या बुद्ध भगवंतांनी उपदेशिलेल्या धम्मास मी नमस्कार करतो.

सन्मार्गावर आरुढ झालेल्या भगवंतांच्या श्रावक संघास मी नमस्कार करतो.




त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.

त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.

त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.



त्रिशरण



मी बुद्धाला शरण जातो.

मी धमाला शरण जातो

मी संघाला शरण जातो.





दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.

दुसऱ्यांदा मी धमाला शरण जातो

दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.




तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.

तिसऱ्यांदा मी धमाला शरण जातो

तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.





पंचशील




मी जीवहिंसेपासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.


मी चोरी करण्यापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.


मी कामवासनेच्या दुराचारापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.


मी खोटे बोलण्यापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.


मी मद्य, तसेच इतर मादक पदार्थांच्या सेवनापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.





बुद्ध पुजा





वर्ण आणि गंध अशा गुणांनी युक्त पुष्पमालांनी
मी मुनिंद्राच्या श्रीपादकमलांची पुजा करतो


या कुसुमांनी मी बुद्धाची पुजा करतो.
 या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल.
 हे फुल ज्याप्रमाणे कोमेजुन जाते
त्याप्रमाणे माझे शरीर नाश पावणारे आहे.


अंधकाराचा नाश करणाऱ्या सर्वव्यापक प्रकाशमान
अशा या दीपाप्रमाणे विश्वातील अज्ञानरुपी अंधकाराचा
नाश करणाऱ्या त्रिलोकदिप सम्यक सम्बुद्धाची मी पुजा करतो.


सुगंधयुक्त शरीर आणि वदन व अनंतगुण सुगंधाने
परिपुर्ण अशा तथागतांची मी सुगंधाने पुजा करतो.


बुद्ध, धम्म, संघ लंका जम्बुद्वीप, नागलोक
आणि त्रिदशपुरांतील स्तुपांमधुन स्थापित
 बुद्ध शरीराचे अवशेष, धातु आहेत, सर्व दहा
दिशातील बुद्धांच्या केश, लोम आदी अवशेषांची
जितकी रुपे आहेत, त्या सर्वांना, सर्व बुद्ध, दशबलतनुज
 आणि बोधिचैत्य ह्या सर्वांना मी नमन करतो.



सर्व ठिकाणी प्रतिष्ठित केलेल्या बुद्ध
शरीराच्या धातु अवशेषांना, महाबोधिवृक्ष
 व चैत्यांना मी वंदन करतो. कारण ही सदैव बुद्धाचीच रुपे आहेत...




बुद्ध वंदना




अर्हंत (जीवनमुक्ति) , सम्यक (संपुर्ण) , सम्बुद्ध (जागृत) , विद्या व आचरण यांनी युक्त , सुगति ज्याने प्राप्त केलेली आहे . असा लोकांना जाणणारा , सर्वश्रेष्ठ , दमनशील पुरुषांचा सारथि व आधार देणारे , देव मनुष्य व यांचा गुरु असा हा भगवान बुद्ध आहे.



अशा या बुद्ध भगवन्ताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करित आहे ।।१।।



मागे जे बुद्ध होऊन गेलेत पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध आहेत त्या सर्वांनाच मी सदैव वन्दन करतो ।।२।।



मला दुसऱ्‍या कोणाचाही आधार नाही , केवळ बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे . ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो ।।३।।



बुद्धाच्या पवित्र चरणधुळीला मस्तक वाकवून मी वन्दन करतो . बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर तो बुद्ध भगवान मला क्षमा करो ।।४।।



ह्या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही . त्या (बुद्ध) रत्नाने माझे कल्याण होवो . (ज्ञान प्राप्त झालेल्या) ज्याने पुज्य बोधिवृक्षाखाली बसून मार (कामदेव) ह्याच्या अफाट सेनेसह पराभव केला . अनन्त ज्ञान प्राप्त करुन ज्याने बुद्धत्व प्राप्त करुन घेतले . जो सर्व जगात श्रेष्ठ आहे . अशा बुद्धाला मी नमस्कार करतो ।।५।।





धम्म वंदना




भगवंताने ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला , ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते , जो धर्म आपले फळ ताबडतोप देतो , कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा , जो निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विज्ञानाच्या द्वारे स्वता अनुभवून पहाता येतो , अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे . ।।१।।



जो भूतकाळातील बुद्धां द्वारे उपदेशिला धम्म आहे जो भविष्यकाळात बुद्धा द्वारे उपदेशिला धम्म असेल , तसेच वर्तमान काळात बुद्धाद्वारे उपदेशिला धम्म आहे , त्या सर्व धम्माला मी सदैव वंदन करीतो . ।।२।।



मी दुसऱ्‍या कोणाला शरण जाणार नाही . दुसऱ्‍या कोणाचा मी आधार घेणार नाही . बुद्ध धम्मच माझा एकमेल आधार आहे . ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो . ।।३।।



सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या ह्या बुद्ध धम्माला मी मस्तक नम्र करुन वन्दन करतो , धम्मा संबंधी माझ्या कडून काही दोष घडला असेल तर धम्म त्या बद्दल मला क्षमा करो ।।४।।




ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्न आहेत , एकानेही बुद्धाच्या धम्माची बरोबरी केली नाही , ह्यामुळे माझे कल्याण होवो ।।५।।



हा जो लोकांसाठी उपयुक्त , श्रेष्ठ अष्टांगीक मार्ग आहे , हा जो निर्वाण प्राप्तिसाठी सरळ मार्ग आहे जो सर्वश्रेष्ठ शान्तीदायक सधम्म आहे , मी त्या धम्माला वन्दन करतो ।।६।।





संघ वंदना




भगवन्ताचा शिष्यसंघ सन्मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ सरळ मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ ज्ञानाच्या मार्गावर आरुढ आहे .
भगवन्ताचा शिष्यसंघ उत्तम मार्गावर आरुढ आहे .



भगवन्ताचा शिष्यसंघ अशा नर रत्नांचा आहे की ज्याने चार जोड्या अशा आठ सप्तपदाची प्राप्ती करुन घेतली आहे , हा संघ निमंत्रण देण्यास योग्य , स्वागत करण्यास योग्य , दक्षिणा देण्यास पात्र , तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे . असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे . मी जन्मभर असा संघाचे अनुकरण करीत आहे . ।।१।।




असा जो भूतकाळातील , भविष्य काळातील व हल्लीही असलेला भगवान बुद्धाचा श्रावक संघ आहे . त्या सर्वांना मी सदैव वन्दन करतो ।।२।।




मला दुसऱ्‍या कशाचाही आधार नाही . बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे , ह्या सत्वचनाने माझे जयमंगल होवो ।।३।।




तिन्ही प्रकारानी श्रेष्ठ असलेल्या ह्या संघाला मी मस्तक वाकवून प्रणाम करतो . संघ संबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर संघ त्याबद्दल क्षमा करो . ।।४।।




ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत यापैकी एकाच्यानेही संघाची बरोबरी होणार नाही . याच्यामुळे माझे कल्याण होवो . ।।५।।



संघ विशुद्ध , श्रेष्ठ , दक्षिणा देण्यास योग्य , शान्त इन्द्रियांचा , सर्व प्रकारच्या अलिप्त , अनेक गुणांनी युक्त तसाच निष्पाप आहे . ह्या संघाला मी प्रणाम करतो .




त्रिरत्न वंदना




अनंत गुणांचे सागर अशा भगवान बुद्धाला मी नमस्कार करतो, मित्रत्वाच्या भावनेने सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. ते शरीर तर दुर्गंधाची खाण आहे, सर्व प्राणी जगत विनाशाला जाणारे आहे. मी सुद्धा मरणधर्मीच आहे.


भगवंताने उपदेशिलेल्या धम्मास मी नमस्कार करतो, मित्रत्वाच्या भावनेने सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. ते शरीर तर दुर्गंधाची खाण आहे, सर्व प्राणी जगत विनाशाला जाणारे आहे. मी सुद्धा मरणधर्मीच आहे.



मुनिराज भगवान बुद्धच्या श्रावक संघाला मी नमस्कार करतो, मित्रत्वाच्या भावनेने सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. ते शरीर तर दुर्गंधाची खाण आहे, सर्व प्राणी जगत विनाशाला जाणारे आहे. मी सुद्धा मरणधर्मीच आहे.




संकल्प




मी ह्या धम्माचरणाने बुद्ध, धम्माचरणाने बुद्ध धम्म व संघाची पुजा करतो.


ह्या आचरणाने मला खचितच जन्म, जरा व मृत्य ह्यांपासुन मुक्ती मिळेल.


या पुण्याचरणाने निर्वाण प्राप्तीपर्यंत मला कधीही मुर्खांची संगत न घडो, सदैव सत्पुरुषांचाच सहवास घडो.


पिकांच्या वृद्धीकरिता वेळेवक़ पाऊस पडो, संसारातील प्राणीमात्राची वृद्धी होवो आणि शासनकर्ते धार्मिक होवोत.





धम्मध्वज वंदना




वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या डोक्यावरील व दाढीवरील केसातून व डोळ्याच्या नीलस्थानातुन प्रभावित होणारा निळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।१।।



वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणार पिवळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।२।।



वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या मांसातील व डोळ्यातील रक्त वर्ण स्थानांतील आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।३।।



वज्रासारखा अभेद देह धारण कराणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या दातांतून , अस्थितून , डोळ्यातील पांढऱ्‍या स्थळांतून प्रभावित होणारा शुभ्र रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापुन राहीला आहे ।।४।।



वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयवात मन प्रभावीत होणारा केसरी रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।५।।



वज्रासारखा अभेद्य देह आणि वरील रंगानी परिपूर्ण असलेल्या अनंतामध्ये फडकणाऱ्‍या व सदैव मनोहर दिसणाऱ्‍या भगवान बुद्धाच्या धम्मध्वजाला आम्ही काया , वाचा व मनाने वंदन करतो ।।६।।





विहार वंदना...





आम्ही हे क्षेत्र, त्रिरत्नास समर्पण करतो.


मानवाच्या संबोधीप्राप्तीचा आदर्श, अशा बुद्धास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


ज्या धम्ममार्गाच्या आचरणास आम्ही सिद्ध झालो आहोत, त्या धम्मास आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो,


ज्यांचात परस्पर कल्याणमित्रतेचा आनंद आम्ही उपभोगतो, अशा संघास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


येथे कोणत्याही व्यर्थ शब्दांचे उच्चारण केले जाऊ नये. येथे चंचल विचारांनी आमची मने कंपित होऊ नयेत.


पंचशीलांच्या परिपालनासाठी, ध्यान-साधनेच्या सरावासाठी, प्रज्ञेच्या विकासासाठी, आणि संबोधीच्या प्राप्तीसाठी, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


बाह्य जगात जरी द्वेष उफाळत असला,
तरी येथे मात्र मैत्री नांदो. बाह्य जगात जरी दुःख खदखदत असले, तरी येथे मात्र आनंद नांदो.


पवित्र समजल्या जाणाऱ्या ग्रंथाचे पठण करुन नव्हे, किंवा पवित्र समजल्या जाणाऱ्या जलाचे सिंचन करुनही नव्हे. तर संबोधि प्राप्तीसाठी प्रयत्नशील बनुन, आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो.


या परिमंडलाभोवती, या पवित्र क्षेत्राभोवती, परिशुद्धतेची कमलदले उमलोत.


या परिमंडला भोवती, या पवित्र क्षेत्राभोवती दृढ प्रज्ञेचा वज्रतट उभा राहो.


या पवित्र क्षेत्राभोवती, संसाराचे निर्वाणात परिवर्तन करणाऱ्या अग्निज्वाला उफाळोत.


येथे बसुन, येथे आचरण करुन, आमची मने प्रबुद्ध बनोत. आमचे विचार धम्म बनो, आणि आमचे परस्परातील संबंध संघ बनोत.


सर्व प्राणिमात्रांच्या सुखासाठी आणि सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी, काया, वाचा आणि मनाने आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो..




महामंगल सुत्त..




भगवान बुद्ध श्रावस्थी येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करत असताना,, एक देवता रात्र संपता, संपता आपल्या तेजाने सर्व जेतवन प्रकाशित करीत भगवंताजवळ आली व भगवंताला वंदन करुन एका बाजुला उभी राहिली. आणी एक गाथा म्हटली..



हे भगवान! स्वतःचे कल्याण इच्छिणार्या पुष्कळ देव आणी मणुष्यांनी मंगलाचा विचार करुनही ते त्यांना गवसले नाही. तेव्हा उत्तम मंगल कोणते ते आपण सांगा


भगवान म्हणाले-


मुर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगती करणे व पुजनीय लोकांची पुजा करणे हेच उत्तम मंगल होय!!



अनुकुल स्थळी निवास करणे, पुर्वपुण्य पदरी असणे आणी स्वतःला सन्मार्ग लावणे हे उत्तम मंगल होय!!



अंगी बहश्रृतता असणे, कला संपादणे, श्ष्टता बाळगणे, आणी सुभाषण करणे, हेच उत्तम मंगल होय!!



आई वडिलांची सेवा करणे, पत्नी व मुलाबाळांचा सांभाळ करणे व उलाढाली न करणे,हेच उत्तम मंगल होय!!



दान देणे, धम्माचरण, आप्तेष्टांचा आदर-
सत्कार करणे व पापाचरणांपासुन अलिप्त राहणेहेच उत्तम मंगल होय!!



काया, वाचा व मनाने अकुशल कर्म न करणे, मद्यपान न करणे व धार्मिक कार्यात तत्पर असणे. हेच उत्तम मंगल होय!!



गौरव करणे, अंगी नम्रता असणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणी वेळेवर
धर्मश्रवण करणे, हेच उत्तम मंगल होय!!



क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे,सत्पुरुषांचे दर्शन घेणे व वेळोवेळी धार्मिक
चर्चा करणे,हेच उत्तम मंगल होय!!



तप करणे, ब्रह्मचर्येचे पालन करणे,आर्यसत्याचे ज्ञान संपादणे आणी
निर्वाणाचा साक्षात्कार करणे हेच उत्तम मंगल होय!!



ज्याचे मन लोक धर्माने विचलीत होत नाही, जो शोकही करीत नाही, तो तर अगदी निर्मळ व पवित्र राहतो, हेच त्याच्याकरीता उत्तम मंगल होय...



याप्रमाणे कार्य करुन जगात विजयी होऊन लोक कल्याणाचा साक्षात्कार करतात, हेच त्यांच्याकरीता उत्तम मंगल होय





करणीय सुत्त



शांती पदाची प्राप्ती हिच्छिणाऱ्या , कल्याण साधनात प्रविण मनुष्यांनी प्रथम योग्य, ॠजु आणि अत्यंतु ॠअजु बनावे, त्याची वाणी मधुर, मृदु आणि विनीत असावी



तो रंतोषी सहजासहजी जीवन चालवणारा आणि त्याची राहणी साधी असावी. तो इंद्रियाने शांत असावा. हुशार, प्रगल्भ आणि कुटुंबात अनासक्त असावा.



जेणेकरुन विद्वान लोक नावे ठेवतील असे लहानात लहान सुद्धा कार्य करु नये. सर्व प्राणी सुखी होवोत. सर्वांचे कल्याण होवो, सर्वच सिद्धीस प्राप्त होवोत (अशी मैत्रीभावना करावी)



जम असोत वा स्थावर, दीर्घ असोत वा महान मध्यम असोत वा ह्रस्व, लहान असोत वा मोठे, दृश्य असोत वा अदृश्य, दुर असोत वा जवळ, उत्पन्न झालेले असोत वा उत्पन्न न झालेले सर्व प्राणी सुखी असोत.



कोणाचीही कोणी वंचना न करोत, कोणीही कोणाचा अपमान न करोत. वैमनस्य किंवा विरोध चर्याने कोणीही कोणाला दुक्ख देण्याची इच्छा न करोत.



ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन पणास लावते, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांच्या प्रती मनात निस्सीम प्रेम भाव जागृत करावा.



मनातील बाधा वैरभाव आणि शत्रुत्व झटकुन, वर खाली व आजुबाजुला सर्वच जगताच्या प्रती मनात निस्सीम प्रेम - भाव वाढवावा.



उभे असता, बसले असता वा झोपले असता म्हणजे जोपर्यंत जागृत असेल, तोपर्यंत अशीच स्मृती ठेवावा, यालाच ब्रह्मविहार असे म्हणतात.



असाच मनुष्य कधी मिथ्यादृष्टीत न पडता, शीलवाण होऊन, विशुद्ध दर्शनाने युक्त होऊन, कामतृष्णेचा नाश करुन गर्भशय्येतुन मुक्त होतो.





महामंङल गाथा




महाकारुणिक भगवान बुद्धांनी समस्त प्राण्याच्या हितकरीता दहा पारमिता पुर्ण करुन उत्तम अशी संबोधी प्राप्त केली. या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.



शाक्य वंशाला आनंद देणाऱ्या भगवान बुद्धांनी बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बसुन मारेसेनेचा पराभव करुन विजय मिळवला, त्याचप्रमाणे तुमचे कल्याण होवो.



राग, द्वेष व मोहादी विकारावर देव व मनुष्याच्या कल्याणासाठी बुद्धरत्न या उत्तम औषधाचे सत्कारपुर्वक ग्रहण करावे, जेणे करुन या तेजोमय बुद्धरत्नाच्या प्रभावाने तुमचे कल्याण होवो. आणि सर्व दुःख व उपद्रव नाश पावतील.



चिंता नष्ट करणारे श्रेष्ठ व उत्तम धर्मरत्न हे औषध आहे. त्याच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्वभय शांत होवोत.



आमंत्रण व पाहुणचार करण्यास पात्र असलेले संघरत्न हे उत्तम औषध आहे. अशा तेजोमय संघाच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्व उपद्रव व रोग नष्ट होवोत.



विश्वात जी काही मौल्यवान रत्ने गणली जातातत्यात बुद्ध, धम्म व संघाची बरोबरी करणारे एकही अस्तित्वात नाही, ह्या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.




बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याशिवाय अन्य दुसरे कोणतेही शरण-स्थान मला नाही. या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.



तुमचे सर्व भय, वैर, रोग नष्ट होवोत. सर्व विघ्नबंधन संपुन तुम्हाला सुख व दीर्घायुष्य प्राप्त होवो.



सर्व बुद्ध, धम्म व संघाच्या प्रतापाने तुमचे मंगल होवो. सर्व देवता तुमचे रक्षण करोत आणि तुमचे कल्याण होवो.



जे वाईट निमित्त, अपशकुन, अप्रिय शब्द, पापग्रह, वाईट स्वप्न, ते सर्व बुद्ध, धम्म व संघाच्या प्रतापाने नष्ट होवोत..




जयमंङगल अठ्ठगाथा




ज्या मुनींद्राने सुदृढ हत्यार धारण केलेल्या, सहस्रबाहु, गिरीमेख नावाच्या हत्तीवर आरूढ झालेल्या, अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला व त्याच्या अफाट सेनेला आपल्या दान आदि धर्म बळाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.



ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुक़ ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.



ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंअकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.



ज्या मुनींद्राने, हातात तलवार घेऊन एक योजनपर्यंत धावणाऱ्या, अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या ॠद्धीबलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.



ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारझे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.



ज्या मुनींद्राने, सत्य सोडलेल्या व असत्यवादाला पोषक, अभिमानी, वादविवादपरायण व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकास प्रज्ञाप्रदीपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.



ज्या मुनींद्राने, विविध महाॠद्धीसंपन्न, नंदोपनंद नामक भुजंगाला आपल्या महामोग्गलान शिष्या जडुन रिद्धि आणि उपदेशाच्या बलाने जिंकले, त्या तेजाने तुमचे कल्याण होवो...


ज्या मुनींद्राने, भयंकर मिथ्या दृष्टिरुप सापाने दंश केलेल्या, विशुद्धज्योती आणि ॠद्धिशक्तिसंपन्न बक नामक ब्रह्मज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो...




धम्मपालन गाथा




कोणतेही पाप न करणे, सद्धम्माचे पालन करणे, आणि आपल्या मनाला सन्मार्गावर लावणे हेच बुद्धाचे शासन आहे. सुचरित धम्माचे आचरण करावे, दुराचरणाचा त्याग करावा. धम्माचरण करणाऱ्यास, सर्व लोकांत सुखाचीच झोप लागते.



साधु साधु साधु

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...






Read Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)


२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज



३. Buddha Vandana : English