मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

ब्राह्मण वर्णाची थोरवी (मज्झिम निकाय : अश्वलायन सुत्त)

चारही वर्णांमध्ये ब्राह्मणच सर्वश्रेष्ठ बाकिचे सर्व वर्ण हीन अशी ब्राह्मणांची समजुत होती परंतु भगवान बुद्धांनी त्यांचा हा सिद्धांत नाकारला. व मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावरुन ठरत नसते हे ब्राह्मणांना पटवुन देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची कथा मज्झिमनिकायाच्या अश्वलायन सुत्तामध्ये आली आहे, प्रस्तुत सुत्तामध्ये भगवान बुद्ध आणि अश्वलायन ब्राह्मण कुमारामध्ये झालेली चर्चा सांगीतलेली आहे..


एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडिकाच्या जेतवनात आराम करत असताना त्यावेळी निरनिराळ्या राष्ट्रांतुन पाचशे ब्राह्मण श्रावस्तीला आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये असा मुद्दा निघाला कि, हा श्रमण गौतम चारही वर्णांना मोक्ष आहे असे म्हणतो. त्याच्याशी या मुद्द्यावर वादविवाद करुन त्याला वादविवादात हरविण्याला कोणी समर्थ आहे का.?


खुप वेळ झाल्यावर निष्कर्ष निघाला कि,, अश्वलायन नावाच्या ब्राह्मणकुमाराने श्रमण गौतमाशी वाद करावा.



अश्वलायन कुमाराचे अध्ययन नुकतेच पुर्ण झाले होते. तो खुप हुशार होता, त्याला सर्व वेद तोंडपाठ येत होते. तथापि, भगवान बुद्धांसोबत वाद करणे कठीण आहे, हे तो जाणुन होता. जेव्हा त्याला वादविवादात पुढे जाण्याची ब्राह्मणांनी विनंती केली तेव्हा अश्वलायन ब्राह्मणांना म्हणाला,, 'श्रमण गौतम हा धर्मवादी आहे, आणि धर्मवादी लोकांशी वाद करणे खुप कठीण आहे. जरी मी सर्व वेदांमध्ये पारंगत असलो, तरी श्रमण गौतमासोबत वाद करायला समर्थ नाही.


यावर ब्राह्मण अश्वलायन कुमाराला म्हणाले, हे अश्वलायन, तुझ्याएवढा धर्मज्ञानी आमच्यामध्ये दुसरा कोणीही नाही. तु परिव्राजक धर्माचा अभ्यासक आहेस, आणि युद्ध न करता पराभव स्वीकारणे तुला योग्य नाही.


अश्वलायन म्हणाला, गौतमासोबत वाद करणे खुप कठीण काम आहे, परंतु तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी गौतमाशी वादविवाद करायला तयार आहे....


नंतर त्या सर्व ब्राह्मणांसोबत अश्वलायन भगवान बुद्धांजवळ गेला, आणि बाजुला बसला आणि बुद्धाला म्हणाला,,


हे गौतमा ब्राह्मणांचे म्हणने आहे कि ब्राह्मणवर्णच सर्वश्रेष्ठ आहे, बाकिचे सर्व वर्ण हीन आहेत. ब्राह्मणांनाच मोक्ष मिळतो, इतरांना नाही. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखातुन उत्पन्न झाल्याने तेच सर्वश्रेष्ठ आहेत, इतर सर्व हीन आहेत. या मुद्याबद्दल आपले काय म्हणने आहे..?


यावर भगवान म्हणाले,, हे अश्वलायन कुमार, ब्राह्मणांच्या बायका गरोदर होतात, प्रसुत होतात, बाळांना जन्म देतात. याचप्रमाणे ब्राह्मणांची संतती इतर वर्णियांप्रमाणेच आईच्या उदरातुन जन्मली असताना, ब्राह्मणांना आपण ब्रह्मदेवाच्या मुखातुन जन्मलो असा समज आहे.


भगवान म्हणाले, हे अश्वलायन यौन, कंबोज व इतर सरहद्दीवरील प्रदेशात आर्य आणि दास असे दोनच वर्ग असुन कधी कधी आर्याचा दास होतो आणि दासाचा आर्य होतो हि गोष्ट तुला माहीत आहे काय..?

यावर अश्वलायन म्हणाला, होय गौतमा मी याबद्दल ऐकले आहे..

भगवान म्हणाले,, जर असे आहे तर ब्राह्मणांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मुखातुन झाली, आपल्या या म्हणण्याला आधार काय.?


यावर अश्वलायन म्हणाला, हे गौतमा याबाबत आपले म्हणने काही असो, परंतु ब्राह्मणांची अशी समजुत आहे कि, ब्राह्मणच सर्व वर्णात श्रेष्ठ आहेत, आणि बाकिचे इतर सर्व वर्ण हीन आहेत.


भगवान म्हणाले, क्षत्रीयाने, वैश्याने किंवा शुद्राने चोरी केली, व्यभिचार केला, चहाडी केली, व्यर्थ बडबड केली, द्वेषबुद्धी वाढविली, नास्तिकपणा अंगिकारला, तर तो नरकात जाईल, परंतु ब्राह्मणांनी हि पापकर्मे केली तर तो नरकात जाणार नाही, असे म्हणायचे आहे का तुला..?



अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने हि पापकर्मे केली असता तो नरकातच जाईल.


भगवान म्हणाले, एखादा ब्राह्मण प्राणघातापासुन निवृत्त झाला, शिवीगाळ करण्यापासुन निवृत्त झाला., चोरी करण्यापासुन निवृत्त झाला., द्वेषापासुन निवृत्त झाला., तर तो स्वर्गात जाईल परंतु इतर वर्णाच्या लोकांनी हि चांगले कर्म केले असता ते स्वर्गात जाणार नाहीत असे म्हणायचे आहे का तुला...?


अश्वलायन म्हणाला, कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने ही चांगली कर्मे केली असता तो स्वर्गातच जाईल. पुण्यकर्माचे फळ ब्राह्मणाला आणि ब्राह्मणेत्तरांना सारखेच मिळेल.


भगवान म्हणाले, या प्रदेशात केवळ ब्राह्मणच द्वेषविरहित मैत्रीभावनेने विहार करु शकतो काय.? क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र वर्णाच्या लोकांना हे जमणार नाही असे तुला वाटते काय..?


अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा, चारही वर्णाच्या लोकांना मैत्रीभावनेने विहार करता येईल.


भगवान म्हणाले, मग चारही वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आणि बाकिचे सर्व वर्ण हीन आहेत या म्हणण्याला आधार काय आहे.?


अश्वलायन म्हणाला, आपण काहीही म्हणा परंतु ब्राह्मणांची अशी समजुत आहे कि चारही वर्णात ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत आणि बाकिचे हीन.


भगवान म्हणाले, हे अश्वलायन समज एखाद्या राजाने विविध जातीच्या शंभर लोकांना एकत्रीत केले, त्यांच्यापैकी क्षत्रीय, ब्राह्मण कुळात जन्मलेल्यांना म्हणेल कि, चंदन वृक्षांच्या लाकडांना जाळुन अग्नी उत्पन्न करावी, आणि हीन कुळात जन्मलेल्या लोकांना सांगेल कि, कुत्र्याच्या खाण्याच्या भांड्यात एरंडाचे उत्तरारणी करुन अग्नी उत्पन्न करावी. हे अश्वलायन, क्षत्रीय व ब्राह्मण वर्णाच्या लोकांनी केलेला अग्नी अधिक तेजस्वी होईल. व हीन वर्णाच्या लोकांनी केलेला अग्नी होणार नाही, त्या अग्नीची कार्ये होणार नाहीत असे तुला वाटते काय..?


अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा, कोणत्याही जातीच्या माणसांनी पेटविलेला अग्नी सारखाच तेजस्वी होईल.


भगवान म्हणाले, एखाद्या क्षत्रीयाने ब्राह्मण कन्येसोबत शरीरसंबंध ठेवले, आणि त्या संबंधापासुन त्यांना मुलगा झाला, तर तो आपल्या आईसारखा किंवा वडिलांसारखा होईल असे तुला वाटते..? त्याचप्रमाणे एखाद्या ब्राह्मण कुमाराने क्षत्रीय कन्येसोबत केलेल्या शरीरसंबंधाने त्यांना मुलगा झाला असता होणारा मुलगा त्या दोघांसारखा न होता वेगळ्या जातीचा होईल असे तुला वाटते काय..?


अश्वलायन म्हणाला, अशा प्रकारच्या संबंधामुळे झालेला मुलगा त्याच्या आईवडीलांप्रमाणेच होईल. त्याला क्षत्रीय किंवा ब्राह्मणही म्हणता येईल.


भगवान पुढे म्हणाले, पण अश्वलायन एखाद्या घोडीच्या आणि गाढवाच्या संबंधातुन निर्माण झालेल्या शिंगरुला त्याच्या आईसारखे किंवा वडिलासारखे म्हणता येईल काय.?

अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा तो तिसऱ्याच जातीचा बनेल., त्याला घोडा किंवा गाढव म्हणता येणार नाही. परंतु ब्राह्मण आणि क्षत्रीया यांच्या संबधातुन झालेल्या मुलाबद्दल असे म्हणता येणार नाही.



भगवान म्हणाले. हे अश्वलायन दोघा ब्राह्मण भावांपैकी एक वेदपठन केलेला चांगला सुशिक्षीत असेल आणि दुसरा अशिक्षीत. तर ब्राह्मण त्यांच्यापैकी कोणाला यज्ञामध्ये आमंत्रीत करतील..?


अश्वलायन म्हणाला, जो सुशिक्षीत असेल आणि वयाने लहान जरी असला तरी त्यालाच यज्ञामध्ये प्रथम आमंत्रीत केले जाईल.


भगवान म्हणाले, जर दोन भावांपैकी एक मोठा विद्वान आहे, पण अत्यंत दुराचारी आहे ; दुसरा फारसा विद्वान नाही परंतु शीलवान आहे, तेव्हा या दोघांपैकी प्रथम कोणाला आमंत्रीत करण्यात येईल..?


अश्वलायन म्हणाला, जो शीलवान आहे त्यालाच प्रथम आमंत्रीत केले जाईल, दुराचारी मनुष्याला दिलेल्या दानापासुन काय लाभ मिळणार..?



भगवान म्हणाले, हे अश्वलायन प्रथम तु जातीला महत्त्व दिलेस, नंतर वेदपठणाला आणि आता शीलाला महत्त्व देत आहेस. अर्थात मी जी चातुर्वर्णाची शुद्धी सांगतोय तिचा तु अंगीकार केला आहेस.


भगवान बुद्धांचे हे भाषण ऐकुन अश्वलायनाला काही सुचतच नव्हते,


भगवान म्हणाले, हे अश्वलायना प्राचीन काळी सात ब्रह्मर्षी अरण्यात राहत असताना, त्यांची एक अशी पापी समजुत झाली होती कि, ब्राह्मणवर्णच सर्वश्रेष्ठ आहे बाकिचे इतर वर्ण हीन आहेत, असीत ॠषीला जेव्हा हि गोष्ट समजली तेव्हा आपली हजामत करुन घेऊन त्या सात ब्राहण ॠषींच्या निवसाजवळ आला, व त्यांच्यासमोर चंक्रमण करत म्हणाला, हे ब्रह्मॠषी कोठे दिसत नाही बरे..?


असीत ॠषींचे हे उद्धटपणाचे वागणे ऐकुन त्या ब्राह्मणांना राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, हे चांडाळा तु भस्म हो.. परंतु त्या शापाचा असीत ॠषींवर काहीएक परीणाम न होता तो अधिकच तेजस्वी दिसु लागला.



तेव्हा ते ब्रह्मॠषी एकमेकांनाच म्हणाले,, अरेरे आमचे तप व्यर्थ आहे, आमचे ब्रह्मचर्य निष्फळ आहे, आमच्या शापाचा याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.


असीत ॠषी म्हणाला, तुमचे तप व्यर्थ नाही, तुमचे ब्रह्मचर्य निष्फळ नाही, तुम्ही विनाकारण रागावणे सोडले पाहिजे.


असीत ॠषी म्हणाला, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे व इतर वर्ण अशी तुमची समजुत झाली आहे, असे मी ऐकले आहे, पण तुमच्या पुर्वजांनी ब्राह्मण स्त्रीसोबतच लग्न केले आहे, याची तुम्हाला खात्री आहे काय..? तुमच्या आज्यांनी पणज्यांनी व इतर पुर्वज स्त्रीयांनी ब्राह्मण पुरुषांशीच संबंध ठेवला होता याची तुम्हाला खात्री आहे काय..?


ब्रह्मॠषी म्हणाले, नाही आम्हाला याबद्दल काहीच सांगता येणार नाही.


असीतॠषी म्हणाला, तर मग ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ व इतर वर्ण हीन आहेत याला अर्थ काय..? या प्रश्नाने ते सात ब्रह्मॠषी निरुत्तर झाले.


हे ऐकुन अश्वलायन भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने खुप प्रभावित झाला, आणि भगवान बुद्धांचा उपासक झाला.....

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा