गुरुवार, २५ जून, २०१५

केवळ "पुनर्जन्म" ह्या मान्यतेमुळे धम्म विज्ञाननिष्ठ नाही..?


                आजकाल दूरचित्रवाणी वरील मालिकांमधून, अनेक सिनेम्यांमधून पुनर्जन्म हा विषय विविध प्रकारे रंगवून दाखविला जातो.  मुळातच पुनर्जन्म हा प्राचीन सिद्धांत त्यातही तो धर्मग्रंथाद्वारे समजल्यामुळे धर्मग्रंथातील इतर सिद्धांताप्रमाणे तो सुद्धा विज्ञान विरोधी असेल अशी आपली मान्यता बनून जाते.  पुनर्जन्म ह्या विषयाला आपण पुरोगामी - प्रतिगामीच्या वर्गवारी मध्ये सुद्धा जोडून पाहतो, जेव्हा आपण असे म्हणतो, "आजकालच्या जमान्यातही पुनर्जन्मावर विश्वास ठेवतोस..?"  वास्तवात जर पुनर्जन्म हा खरच निसर्गाचा सिद्धांत असेल तर तो जुना आहे, आणि केवळ टीव्ही मालिकांद्वारे, धर्मग्रंथांद्वारे विकृत केल्या गेल्यामुळे त्याला नाकारणे सपशेल चुकीचे आहे.  आपण आज एकविसाव्या शतकात जगत आहोत, केवळ ह्या अहंकाराने स्वतःला पुरोगामी समजून २००० वर्षांपूर्वीचे सिद्धांत नाकारणे सुद्धा बरोबर नाही.

            पुनर्जन्माचा सिद्धांत नाकारणाऱ्या लोकांमध्ये स्वतःला पुरोगामी तसेच स्वतःला विज्ञानवादी समजणाऱ्या लोकांचा अधिक भरणा असतो. जे काही जुने आहे, जे काही धर्मग्रंथात लिहिले आहे ते सर्व चुकीचे आहे, आणि जे काही धर्मग्रंथात लिहिले नाही ते सर्व विज्ञान आहे, असा ह्या लोकांचा समज असतो.  अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी केवळ धर्मग्रंथात लिहिलेले आहे, आणि स्वतःच्या बुद्धीला पटत नाही म्हणून पुनर्जन्माचा सिद्धांत नाकारणे स्वतःच विज्ञानवादाच्या विरोधी आहे. तर्कवाद हा विज्ञानाचा प्रांत नव्हे, अनुभूती विज्ञानाचा प्रांत आहे, तेव्हा कोणत्याही प्रकारे संशोधन करून पुनर्जन्म हा विज्ञान विरोधी सिद्धांत आहे हे सिद्ध करावे किंवा संशोधन झालेल्या विज्ञानाच्या कोणत्या सिद्धांतानुसार पुनर्जन्म शक्य नाही हे तरी सांगावे.


पुनर्जन्म ह्या मान्यतेमुळे बौध्द धर्म विज्ञान विरोधी आहे, असे मानणेच विज्ञानवाद विरोधी

            काही लोकांच्या मते बौध्द धर्म पुनर्जन्म मानतो म्हणून तो विज्ञानवादी ठरत नाही. वास्तवात आज कित्येक वैद्न्यानिक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात, याचा अर्थ ते सुध्दा विज्ञानवादी नाहीत का...? बौध्द धर्मात आत्म्याला मान्यता नाही पण पुनर्जन्माला मात्र आहे. आपल्या शरीरातील अनित्य आणि अनात्म असलेल्या उर्जेचे पुनर्जन्म होते असे बुद्धांचे म्हणणे आहे.  हा काही कोरा दार्शनिक सिद्धांत नव्हे, ति प्रत्यक्ष सम्यक संबुध्दांची अनुभूती आहे, कोणीही स्वतः त्याचा अनुभव करावा.  सम्यक संबोधीच्या प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी स्वतः एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, वीस, चाळीस, ............. अशाप्रकारे आपल्या सर्वच पुर्वजन्मांचे स्मरण केले. त्यांनी जे काही अनुभव केले तेच जगाला सांगितले, आणि त्या मार्गावर चालून तुम्ही सुद्धा आपल्या पुर्वजन्मांचे स्मरण करू शकता असा बुद्धांचा दावा आहे. तेव्हा निर्वाणाची प्राप्ती झालेल्या अनेक श्रावक - श्राविकांनी सुध्दा आपल्या पूर्वजन्मांचे स्मरण केले आहे. हे एक संशोधन होते, तर्क नव्हे, मग कोणी केवळ जुनी संकल्पना आहे म्हणून विज्ञान विरोधी का म्हणावे...?

            दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, बौध्द धर्मात पुनर्जन्म हा केवळ सिद्धांत आहे, धर्म नाही.  तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवल्याने स्वर्गाची प्राप्ती कराल किंवा तुमचा विश्वास नसेल तर नरकाची प्राप्ती होईल असेही काही नाही. याउलट चौदावे दलाई लामा काय म्हणतात, ते पहा...

 “Whether you believe in God or not does not matter so much, whether you believe in Buddha or not does not matter so much; as a Buddhist, whether you believe in reincarnation or not does not matter so much. You must lead a good life. And a good life does not mean just good food, good clothes, good shelter. These are not sufficient. A good motivation is what is needed: compassion, without dogmatism, without complicated philosophy; just understanding that others are human brothers and sisters and respecting their rights and human dignity.”

            तुमचा देवावर, बुध्दांवर किंवा पुनर्जन्मावर विश्वास आहे किंवा नाही, त्याने जास्त काही फरक पडत नाही. परंतु तुमचा सदाचारावर विश्वास असायला हवा, सदाचारी जीवन जगण्यावर विश्वास असायला हवा, त्याने फारक पडतो. कारण इतर धर्मांप्रमाणे बौध्द धर्म ग्रंथप्रामाण्यवादी नाही, किंवा नास्तिकांच्या प्रमाणे तर्कवादी सुद्धा नाही, तर विज्ञानाप्रमाणे तो अनुभूतीवादी आहे.  जरी कोणत्याही प्रकारे विज्ञानाद्वारे बौध्द धर्माचे सिद्धांत चुकीचे जरी ठरविले गेले तरी सुध्दा बौध्द धर्म बदलण्यास तयार आहे, तो परिवर्तनवादी आहे. यावर दलाई लामा म्हणतात...



सदर फोटो हा झाकीर नाईक यांच्याद्वारे ट्विटर केल्या गेलेल्या ट्विट नंतर फेसबुक वर ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या गेल्या त्यांच्यामधून घेण्यात आलेला आहेजर कोणाला आक्षेप असतील तर तसे कळवावे...


If science proves some belief of Buddhism wrong, then Buddhism will have to change.


            अनेक वैद्न्यानिक जे काही सिद्धांत मांडतात, त्यांच्यापैकी अनेकांमध्ये विविध लिमीटेशन्स असतात, त्यानंतर दुसरा एक वैद्न्यानिक येतो आणि पूर्वीच्या वैद्न्यानिकाने मांडलेल्या सिद्धांतामध्ये असलेल्या लिमीटेशन्स दूर करण्यासाठी दुसरा सिद्धांत मांडतो.  यानुसार प्रथम वैद्न्यानिक मूर्ख ठरत नाही, जर तो प्रथम वैद्न्यानिक दुसऱ्या वैद्न्यानिकाने मांडलेल्या सिद्धांताला स्वीकार करत असेल (जर तो सिध्दांत खरा असेल तरच..!). तरी तो विज्ञानवादीच ठरतो. केवळ पूर्वी चुकीचा किंवा अपूर्ण सिद्धांत मांडल्यामुळे तो विज्ञानविरोधी ठरत नाही. बौध्द धर्माचेही तसेच आहे, जर त्याने मांडलेले सिद्धांत चुकीचे असतील, विज्ञानविरोधी वाटत असतील तर तो बदलवायला तयार आहे. बौध्द धर्मात केवळ पुनर्जन्माची मान्यता असल्याने, आणि ती मान्यता काही स्वतःला विज्ञानवादी समजणाऱ्या पण वास्तवात तर्कप्रामाण्यवादी असलेल्या लोकांच्या तर्काला न पटल्याने ते बौध्द धर्माला विज्ञानविरोधी ठरवीत असतात.  परंतु त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी, तर्कप्रामाण्यवाद म्हणजे विज्ञानवाद नव्हे, वास्तवात हे दोघेही परस्पर विरोधी आहेत.

            विज्ञान म्हणजे असे ज्ञानज्याद्वारे सत्यालानिसर्गाच्या नियमांना अनुभुतीद्वारे जाणले जाते. (तर्कबुध्दीने नाही..!) निश्चितच तर्कप्रामाण्यवाद हा विज्ञानाचा प्रांत नव्हे, अनुभुती हा विज्ञानाचा प्रांत आहे.. मंगळावर जीवसृष्टी आहे किंवा नाहीहे इथे बसुन विशिष्ट ग्रंथ वाचुन किंवा तर्कबुध्दीने जाणले जाऊ शकत नाहीत्यासाठी तिथे जाऊन स्वतः अनुभवच करावा लागेल. साखरेची चव गोड आहे कि कडु हेसुध्दा तर्काने कळणार नाही, त्यासाठी स्वतः तिला खाऊन अनुभवच करावा लागेल. धम्माचे (निसर्ग नियमांचे) सुध्दा अगदी तसेच आहे. ते कोणत्याही प्रकारे तर्कबुध्दीने जाणले जाऊ शकत नाही. त्यांना जाणण्यासाठी स्वतः अनुभवच करावा लागेल. बुध्द तर हेच सांगतात. इतरांप्रमाणे बुध्दांनी चिकित्सा सुध्दा नाकारली नाही. याउलट ते स्वतःची चिकित्सा करायला सांगत असत... हा विज्ञान वाद नव्हे तर मग काय आहे..ग्रंथप्रामाण्यवाद कि तर्कप्रामाण्यवाद.?


बुध्दांचा हा असा धर्म आहे, जो परलोक मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या अशा दोघांनाही सारखाच जवळचा वाटू लागतो...

           परलोकाला मानणे किंवा नाकारणे हा बुद्धांचा धर्म नव्हे.  तर त्याला नाकारून अथवा स्वीकारून आपले चित्त शुध्द करावे, सदाचारी, सुध्द जीवन जगावे हा धर्म आहे. त्यामुळे परलोक स्वीकारणाऱ्या आणि नाकारणाऱ्या अशा दोघांनाही बुद्धांचा धर्म सारखाच जवळचा वाटू लागतो.  वास्तवात जे लोक स्वतःला विज्ञानवादी किंवा विज्ञान निष्ठ समजतात, त्यांनी तर परलोकाचे अस्तित्व नाकारणेच चुकीचे आहे, कारण ह्या अखील विश्वामध्ये कितीतरी ग्रह आहेत, आणि त्यापैकी बऱ्याच ग्रहांवर जीवसृष्टी असणे सहज शक्य आहे, पण जेव्हा तुम्ही ह्या सिद्धांताला स्वीकारू शकत नाही, तेव्हा नाकारू पण नये. असे असले तरी एखादा व्यक्ती परलोकाचे अस्तित्व नाकारतो किंवा परलोकाचे अस्तित्व स्वीकारतो यावरून तो बौध्द किंवा अ-बौध्द ठरत नाही. ह्या जगाच्या प्रती असलेल्या त्याच्या मान्यता त्याच्या बौद्धत्वाच्या आड येत नाहीत. कारण केवळ त्याच्या ह्या जगाच्या प्रती असलेल्या मान्यतेमुळे कोणी बुध्दाचा श्रावक ठरत नाही. कोणी देवांच्या अस्तित्वाचे स्वीकार करो अथवा न करो, कोणी पुनर्जन्म, परलोक, इत्यादींचा स्वीकार करो किंवा न करो त्याने जास्त काही फरक पडत नाही, कारण श्रेष्ठ व सदाचारी जीवन जगणारा प्रत्येक प्रज्ञावान, शीलवान आणि करुणावान जीव हा बुध्दांचा श्रावक आहे.


सर्वोच्च प्रज्ञेच्या प्राप्तीने पुर्वजन्मांचे स्मरण करता येते...

            बौध्द मताप्रमाणे भगवान बुद्धांनी सम्यक संबोधीच्या प्राप्तीसोबातच आपल्या सर्व पुनर्जन्मांचे स्मरण केले.  तसेच प्रत्येक निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीकडे त्यांचे स्मरण करण्याचे बळ येते. त्यांना तेवढी प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञा हि केवळ भरपूर पुस्तके वाचल्याने किंवा भरपूर चिंतन केल्याने प्राप्त होत नाही, तर ति तीन प्रकारे प्राप्त केली जाते.

१. श्रुतमय प्रज्ञा : प्राचीन काळी लेखनकला अवगत नसल्याने ज्ञान हे मुखाने सांगीतले जायचे तर ते कानांनी ग्रहण केले जात असे त्यामुळे याद्वारे भरपूर ज्ञान प्राप्त झालेल्यांना "बहुश्रुत" असे म्हटले जायचे. ह्या काळात आपण जे ज्ञान किंवा शहानपण पुस्तकांतून, शिक्षकाकडून किंवा वडिलधाऱ्या लोकांकडून प्राप्त करतो, त्यांना आपण श्रुतमय प्रज्ञा म्हणू शकतो. परंतु हे ज्ञान सर्वोच्च नसते.

२. चिंतामय प्रज्ञा : जे ज्ञान किंवा शहाणपण आपल्याला चिंतनाने किंवा तर्काने प्राप्त होतेत्यांना चिंतामय प्रज्ञा असे म्हणतात. हे ज्ञान सुध्दा सोर्वोच्च नसतेते सुध्दा मर्यादित असते. कारण काननाकडोळेत्वचाजीभ आणि मन ह्या मानवाच्या सहाही ज्ञानेंद्रियांचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. ते जगात अस्तित्वात असलेल्या सर्वच गोष्टींना अनुभव करु शकत नाही. मानवाच्या इंद्रियांचे कार्यक्षेत्र वाढावे यासाठी संशोधकांनी अनेक उपकरणांचे संशोधन केले. जसे - मानवी त्वचेवर कित्येक सुक्ष्मजीव बसुन आहेतहे तो त्याच्या डोळ्यांनी पाहु शकत नाहीतेव्हा त्याच्या ह्या इंद्रियांचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी त्यांनी मायक्रोस्कोप बनविलाज्याच्या सहाय्याने तो त्यांचा अनुभव करु शकतो. शेकडो वर्षांपुर्वी कोणी असा विचार केला असता, (कि मानवी शरीरावर असंख्य सुक्ष्मजीव विराजमान आहेत.) तेव्हा त्या काळच्या तर्कवाद्यांनी त्याला नक्कीच मुर्खात काढले असते.

३. भावनामय प्रज्ञा : भावनामय प्रज्ञा हि भावना आणि ध्यान साधनेद्वारे प्राप्त केली जाणारी प्रज्ञा आहे. हि प्रज्ञा दुसऱ्या व्यक्तीकडुन प्राप्त झालेली नसतेकोणत्या पुस्तकातुन प्राप्त झालेली नसते किंवा कोणत्या चिंतनाने किंवा तर्काद्वारे सुध्दा प्राप्त होत नसते. तर ती स्वतःच्या अनुभुतीने प्राप्त होते. जसे वर सांगीतल्या प्रमाणे मानवाच्या सर्व इंद्रियांचे कार्यक्षेत्र मर्यादित आहेपरंतु संशोधकांनी तयार केलेल्या उपकरणांद्वारे आपण त्याचे कार्यक्षेत्र वाढवु शकतोतद्वतच आपण विविध प्रकारची अनुभुती सुध्दा करु शकतो. परंतु ते मानवाच्या मनाचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी कोणतेही उपकरण शोधु शकत नाही, (कारण मन किंवा विज्ञान (Conciousness) हे बाह्य जड जगापेक्षा वेगळे असल्यामुळे त्याची रासायनिक परीक्षा करता येत नाही. मनाला रंगरुपआकार किंवा घनता नाही. ते अदृश्य आणि अस्पर्श्य आहे. आणि म्हणुनच ते पंचेंद्रियांना जाणता येत नाही. ते पंचेंद्रियांच्या आदेशाने चालत नाहीतर उलट त्यांच्यावरच ते अधिराज्य गाजविते. इथे हे स्पष्टपणे समजले पाहिजे की मन किंवा विज्ञान (जाणीव) म्हणजे शाश्वत आत्मा किंवा भुत पिशाच्च नव्हे तर एक उर्जा आहे. आणि ती मानवाच्या मृत्युसोबत नष्ट होणे अशक्य आहे.). ते भगवान बुध्दांनी शोधुन काढले आहे. भगवान बुध्दांनी मानवाच्या मनाचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी एका मार्गाचा उपदेश केलात्या मार्गावर चालुन मानवाच्या मनाला होणारे सर्व विकार तर नष्ट होतातच परंतु तो वेगवेगळे विशेष अनुभव सुध्दा करु लागतो. ते अनुभव असे असतात कि मानवाच्या मनाची तर्कबुध्दी तिथपर्यंत पोहोचु शकत नाही.

पुनर्जन्म हा विज्ञान विरोधी सिद्धांत आहे का...?

            अनेक तर्कप्रामाण्यवादी विचारवंताचा असा दावा आहे कि, पुनर्जन्म हि विज्ञान विरोधी संकल्पना आहे, वास्तवात यांचा विरोध अनेक धर्मग्रंथांद्वारे पुनर्जन्मांच्या संकल्पनेला विकृत केल्यामुळे असावा, कारण त्यांनी कोणते संशोधन केले असावे असे मुळीच वाटत नाही. तुमची जी काही जाणीव (consciousness) आहे, ज्यातून तुमचे विचार आणि स्वभावाची निर्मिती होते, ती कोणत्या स्वरूपात असते, यावर विचार केला आहे का..? मनामध्ये ज्या काही भावना निर्माण होतात, आनंद, राग, लोभ, द्वेष, शांती त्यांची जाणीव कोणत्या स्वरूपात अस्तित्वात असेल..? (काय ते मानवाचे अवयव आहेत कि इतर अवयवांप्रमाणे मानवाच्या मृत्युसोबत ते सुध्दा नष्ट पावतील..?)   
       
            मनुष्याचा मृत्यू झाल्यावर सुध्दा काही काळ इतर अवयव जिवंत असतात, परंतु मानवी हृदय मात्र तत्काळ बंद पडतो. मनुष्य मरण पावतो म्हणून इतर अवयव मरण पावत नाहीत. तर मानवाचे हृदय त्यांना रक्तपुरवठा बंद करतो म्हणून ते निकामी होतात. पण ते अवयव मनुष्य मेल्यानंतर इतरांना दान केले जाऊ शकतात, मनुष्य मेल्यानंतर सुध्दा ते अवयव इतर व्यक्तींसाठी उपयोगात येऊ शकतात. पण विज्ञान (consciousness)  हि एक उर्जा आहे, मानवी मेंदूची उर्जा. त्या उर्जेचे जगणे किंवा नष्ट होते कोणत्याही प्रकारे हृदयाद्वारे होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर अवलंबून नाही. त्यामुळे  ती उर्जा मानवाच्या मृत्युसोबत नष्ट होणे अशक्य आहे.


ह्या (परलोक आणि पुनर्जन्म) विषयांवर काही वैद्न्यानिकांचे दावे आणि मते आपण पाहूया...

            कोणत्याही धर्मग्रंथांद्वारे प्रभावित होऊन किंवा त्यांच्याद्वारे केल्या गेलेल्या विकृतीकारणामुळे त्या सिद्धांताला नाकारून नव्हे तर अनेक वर्षांच्या सखोल संशोधनानंतर, जवळपास १५०० लोकांवर केलेल्या प्रयोगानंतर युनायटेड स्टेट्सच्या न्युरोवैद्न्यानिकांनी निष्कर्ष काढला कि, मानवाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या बंद पडलेल्या हृदयानंतर आणि बंद पडलेल्या मेंदूनंतर सुध्दा मानवी विज्ञान (consciousness) अस्तित्वात असते.  (वास्तवात ती एक उर्जा आहे, तर तसे व्हायलाच हवे..) मानवाच्या वैद्यकीय मृत्यूनंतर त्याच्या मेंदूची (विज्ञान / consciousness) जी उर्जा असते, ती तिच्या स्वरूपानुसार दुसऱ्या गर्भात जन्म घेणाऱ्या बाळासोबत पुन्हा जगामध्ये येते, ज्या प्रक्रियेला आपण पुनर्जन्म असे म्हणतो, कारण बाळाचे उर्जेच्या स्वरूपात असणारे विज्ञान गर्भात त्याच्यासोबत निर्माण होत नाही, तर ते त्याला लाभते.  हि (consciousness)  उर्जा तरंगांच्या स्वरूपामध्ये प्रवास करते. आणि केवळ ह्याच पृथ्वीवर नाही तर अनेक (जीवसृष्टी) अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या ग्रहांमध्ये सुध्दा जाऊ शकते, जिथे कोणत्याही यानाद्वारे पोहोचू शकत नाही, असा ह्या वैद्न्यानिकान्चा दावा आहे.    

            विज्ञान (Science) हा असा मार्ग आहे जो माणसाला त्याच्याप्रती अथवा जगाच्या प्रती असलेल्या सत्यालानिसर्गाच्या नियमांना अनुभुतीद्वारे जाणायला शिकवितो, (तर्कबुध्दीने किंवा धर्मग्रंथप्रामाण्य वादाने नाही..!). आज विज्ञानाद्वारे जे काही संशोधन झाले आहेत्याद्वारे आपण जगातील सर्वच निसर्गाच्या नियमांना जाणू शकलो नाहीत. आणखीही बरेच संशोधन होणे बाकी आहेसध्या संशोधन झालेल्या विज्ञानाला अनेक मर्यादा आहेत. Classical Biology च्या आधारे आपण विज्ञान (Consciousness) हि मानवी मेंदूपासून भिन्न आहे किंवा नाही हे सिद्ध करू शकत नाही (विद्यार्थ्याला ह्या दोन्ही गोष्टी एकच वाटतात.)त्यासाठी Modern Biology किंवा Quantum Biology ची गरज आहेयावर न्यूयॉर्क शहरातील Weill Cornell Medical centre चे Dr. Sam Parmia  जे  "मृत्युचा वैद्न्यानिक दृष्टीकोनातून अभ्यास"  ह्या विषयावरील जगातील अग्रणी अभ्यासक आहेतते म्हणतात,,


       
            “We're pushing through the boundaries of science here, working against assumptions and perceptions that have been fixed. The lot of people fixed this idea that when you die, you die; that's it. Death is a moment - you know, you either dead or alive. All these things are not scientifically valid, but they’re social perceptions. 

       “If you look back at the end of the 19th century, physicists at that time had been working with Newtonian laws of motion, and they really felt they had all the answers to everything that was out there in the universe. When we look at the world around us, Newtonian physics is perfectly sufficient. It explains most things that we deal with. But then it was discovered that actually when you look at motion at really small levels – beyond the level of the atoms – Newton’s laws no longer apply. A new physics was needed, hence, we eventually ended up with quantum physics. It caused a lot of controversy – even Einstein himself didn’t believe in it. 

            “Now, if you look at the mind, consciousness, and the brain, the assumption that the mind and brain are the same thing is fine for most circumstances, because in 99% of circumstances we can’t separate the mind and brain; they work at the exactly the same time. But then there are certain extreme examples, like when the brain shuts down, that we see that this assumption may no longer seem to hold true. So a new science is needed in the same way that we had to have a new quantum physics." 

            विज्ञान (Consciousness) आणि मेंदू यांचा संबंध काय..? ते एकच आहे कि एकमेकांच्या पासून भिन्न आहेत.? याचे संशोधन करण्याचा प्रयत्न अनेक संशोधकांनी भौतिकशास्त्राच्या नव्या स्वरूपाचा आधार घेत केला.

 "Quantum Consciousness & Science of Consciousness" ह्या विषयावर संपूर्ण आयुष्य संशोधन करणारे अमेरिकेतील वैद्न्यानिक Staurt Hameroff, (ज्यांचा दावा आहे कि, "विज्ञान /  Consciousness"  हे मानवी शरीराच्या मृत्यूनंतर सुध्दा अस्तित्वात असतेआणि ते प्रवास करू शकतेयाच ग्रहावर नाहीतर अगदी परग्रहावर सुध्दा..) म्हणतात, , The human brain is a perfect Quantum Computer, and Consciousness is simply information stored at the quantum level. It can be transfer after the death of body; Quantum information can be carried by merges with our universe and exists infinitely.

२.  "Quantum Consciousness & Science of Consciousness" ह्या विषयावर संपूर्ण आयुष्य संशोधन करणारे अमेरिकेतील वैद्न्यानिक Staurt Hameroff, (ज्यांचा दावा आहे कि, "विज्ञान /  Consciousness"  हे मानवी शरीराच्या मृत्यूनंतर सुध्दा अस्तित्वात असतेआणि ते प्रवास करू शकतेयाच ग्रहावर नाहीतर अगदी परग्रहावर सुध्दा..) म्हणतात, , The human brain is a perfect Quantum Computer, and Consciousness is simply information stored at the quantum level. It can be transfer after the death of body; Quantum information can be carried by merges with our universe and exists infinitely.


३. Anderei Linde हे Lebedev Physics institute, Russia  चे वैद्न्यानिक होते, जे सध्या अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील Standford विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. ते दुसऱ्या ग्रहांवरील जीवसृष्टी बद्दल म्हणतात"Space consisting of many inflating spheres, which gives rise to similar spheres, and those in turn, produce sphere in even greater numbers, and so on to infinity. In the universe they are spread apart. They are not aware of each other's existence. But they represent the part of same physical universe."

निष्कर्ष :

१. पुनर्जन्माचे अस्तित्व स्वीकारणे किंवा नाकारणे हे एक बौध्द बनण्याचे प्रमाण नाही, कोणताही जीव त्याच्या हृदयात सर्वांच्या प्रती असलेल्या मंगल मैत्री आणि करुणेच्या भावनेनेच तसेच, सर्व प्रकारच्या दुराचाराचा त्याग करून सदाचारी जीवन जगण्याच्या प्रतिज्ञेनेच बुध्दांचा श्रावक बनतो. (केवळ देवांचे, पुनर्जन्माचे, इत्यादींचे अस्तित्व स्वीकारून किंवा नाकारून नव्हे.)

२. बौध्द धर्मात पुनर्जन्म हा सिद्धांत आहे, धर्म नाही, त्यामुळे त्याचा स्वीकार करण्याची सक्ती नाही. मात्र पुनर्जन्म हा सिद्धांत बुद्धांच्या धर्माचे अविभाज्य अंग आहे, हे सुध्दा कोणी नाकारू शकणार नाही. भगवान बुध्दांचा असा दावा आहे, कि सम्यक संबोधी प्राप्ती झाल्यावर त्यांनी त्यांच्या पुर्वजन्मांचे स्मरण केले होते, तर प्रत्येक निर्वाण प्राप्त झालेल्या जीवाला हे सामर्थ्य प्राप्त होते.

३. केवळ पुनर्जन्म मानतो म्हणून बौध्द धर्म विज्ञान विरोधी ठरत नाही. वर सांगितलेले दलाई लामांचे वाचन आठवावे, धर्म हा परिवर्तनशील आहे, धर्म म्हणजे निसर्गाच्या नियमां शिवाय दुसरे काहीही नव्हे. वास्तवात पुनर्जन्म हि विज्ञान विरोधी संकल्पना आहे किंवा नाही, हे वैद्न्यानिक दृष्टीकोनातून केल्या गेलेल्या प्रयोगाद्वारे निघणाऱ्या निष्कर्षाद्वारे ठरवावे, केवळ प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे आणि स्वतःच्या बुद्धीला पटत नाही म्हणून, नाकारू नये.

४. पुनर्जन्म आहे किंवा नाही..? या विषयावर त्यांचे स्मरण करता येऊ न शकणाऱ्या लोकांसाठी चर्चा करणे व्यर्थ आहे. पण ह्या विषयावर संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांचे मत सुध्दा लक्षात ठेवावे.

५. विज्ञानाद्वारे होणाऱ्या पुनर्जन्माबद्दल बौध्द धर्म आणखी काय सांगतो.? त्या विज्ञानाद्वारे होणाऱ्या पुनर्जन्माच्या चक्राचे नष्ट होणे शक्य आहे का..? जर आहे तर कशाप्रकारे...? हे सर्व प्रश्न जर तुम्हाला पडलेली असतील तर अवश्य विचारू शकता, त्यावर नवा लेख लिहिता येईल...


References :

1. Quantum Theory proves that Consciousness moves to another Universe after Death. - An article written by Anna Lemid, 7th December 2013

2. Wikipedia.Com



सुचना : आम्हाला असे आढळून आले आहे कि या ब्लॉग वरील अनेक लेख काही लोक कॉपी करून स्वतःच्याच नावावर शेअर करीत कॉपीराईट कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात, त्या सर्वांना आमचे सांगणे आहे कि ह्या ब्लॉगवरील काहीही मजकूर कॉपी करण्यापूर्वी आमची परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी.....


हे सुध्दा वाचा :
 



४ टिप्पण्या:

  1. बुद्ध धम्म आध्यात्मिक पुनर्जन्म मानतो. भौतिक पुनर्जन्म मानत नाही. आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणजे मनुष्याच्या जिवंतपणीच त्याच्या मनाचे एका अकुशल अवस्थेतून दुसर्‍या कुशल अवस्थेत रुपांतर होणे होय.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बौध्द धर्मामध्ये पुनर्जन्माची मान्यता हि केवळ अध्यात्मिक विकासावर आधारलेली आहे, हि चुकीची माहिती आहे. पुर्वी माझी मान्यता सुध्दा अशीच, होती जेव्हा धर्माचा खोलवर अभ्यास केला तेव्हा समजले. हा पुनर्जन्म अगदी मृत्युनंतरचाच आहे.

      १. निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीला आपल्या पुर्वजन्मांचे स्मरण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आर्यश्रावका शिवाय दुसरा त्याचे स्मरण करु शकत नाही. (अर्थात ते मृत्युनंतरच्या जन्माविषयीच बोलत असावेत, एका अवस्थेतुन दुसऱ्या अवस्थेत जाणाऱ्या व्यक्तीला आपल्या पुर्व अवस्थेचे सहज स्मरण करता येते.)
      २. भगवान बुध्दांनी आपल्या सर्वच पुर्वजन्मांचे स्मरण केले आहे, सर्वज्ञ असल्यामुळे ते दुसर्यांची गती सुध्दा जाणतात. (५४७ जातक कथा ह्या बोधीसत्त्वाच्या पुर्वजन्मी केलेल्या चरियांच्या कथा आहेत.)

      ३. २२७. ‘‘एतदग्गं , भिक्खवे, मम सावकानं भिक्खून पुब्बेनिवासं अनुस्सरन्तानं यदिदं सोभितो।
      अर्थ : माझ्या श्रावकांमध्ये पुर्वजन्मांची अनुस्मृती करणाऱ्यात शोभीत अग्र आहेत.
      (संदर्भ : अंगुत्तर निकाय, एककनिपात - २२७)
      २४४. ‘‘एतदग्गं , भिक्खवे, मम साविकानं भिक्खुनीन पुब्बेनिवासं अनुस्सरन्तीनं यदिदं भद्दा कापिलानी।
      माझ्या श्राविकांमध्ये पुर्वजन्मांची अनुस्मृती करणाऱ्यात भद्दा कापिलानी अग्र आहे.
      (संदर्भ : अंगुत्तर निकाय, एककनिपात - २४४)


      मिलिंद पन्हो ह्या ग्रंथांमध्ये राजा मिलिंद अर्हंत नागसेनांना विचारतो,
      “Will you, Nàgasena, be reborn?”

      यावर अर्हंत नागसेन असे म्हणतात, “What is the use of asking that question again? Have I not already told you that if I die with attachment in my mind I shall be reborn, if not I shall not.”

      अर्थात जर मरत असतांना माझ्या चित्तामध्ये तृष्णा अस्तित्वात असेल तर पुनर्जन्म होईल, अन्यथा होणार नाही. ह्यालाच जोडून भगवान बुद्धांनी सांगितलेला प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत आहे.
      ती साखळी याप्रमाणे :

      अविद्या (Ignorance)
      संस्कार (fabrications)
      विज्ञान (consciousness)
      नामरुप (name-&-form)
      षडायतन (six sense media)
      स्पर्श (contact)
      वेदना (feeling)
      तृष्णा (craving)
      उपादान (clinging/sustenance)
      भव (becoming)
      जन्म (birth)

      अविद्या असल्याने संस्कार होत असतात. संस्कार असल्याने विज्ञान (consciousness) होते. विज्ञान (consciousness) असल्याने नामरुप होत असतात. नामरुप असल्याने षडायतन होत असते. षडायतन असल्याने स्पर्श होत असतो. स्पर्श असल्याने वेदना होत असते. वेदना असल्याने तृष्णा होत असते. तृष्णा असल्याने उपादान होत असते. उपादान असल्याने भव होत असते. भव असल्याने जन्म होत असतो.


      त्या अविद्येला संपूर्णपणे हटविल्याने आणि नष्ट केल्याने संस्कार होत नसतात. संस्काराचा निरोध केल्याने विज्ञान (consciousness) होत नसते. विज्ञानाचा (consciousness) निरोध केल्याने नामरुप होत नसते. नामरुपाचा निरोध केल्याने षडायतन होत नसते. षडायतनाचा निरोध केल्याने स्पर्श होत नाही. स्पर्शाचा निरोध केल्याने वेदना होत नाही. वेदनेचा निरोध केल्याने तृष्णा होत नाही. तृष्णेचा निरोध केल्याने उपादान होत नसते. उपादानाचा निरोध केल्याने भव होत नाही. भवाचा निरोध केल्याने जन्म होत नाही..

      अर्थात जिथे जन्म आहे, तिथे जन्माचा निरोध सुध्दा शक्य आहे...

      हटवा
  2. कर्म आणि विपाक यावर एखादि लेख प्रकाशित करावा हि विनंती

    उत्तर द्याहटवा
  3. महत्त्वपूर्ण माहीती अगदी सोप्या व स्पष्ट शब्दात! धन्यवाद

    उत्तर द्याहटवा